काजू पीक घटल्याने शेतकरी अडचणीत
प्रतिनिधी /मडगाव
काणकोण पासून पेडणे पर्यंत गोव्यात काजूचे पीक घेतले जाते. असंख्य शेतकऱयांचे काजू पीक हे महत्वाचे पीक असून वर्ष भराची गुजराण याच पीकावर गेली जाते. मात्र, यंदा अनअपेक्षित काजूच्या पीकात घट झाल्याने असंख्य शेतकरी अडचणीत आले. त्यात काजूला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे आत्ता सरकारनेचे काजू उत्पादक शेतकऱयांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा, सावर्डे, फोंडा या भागात तर उत्तर गोव्यात सत्तरी, डिचोली, बार्देश, तिसवाडी, पेडणे या भागात काजूचे पीक घेतले जाते. मात्र, यंदा काजू पीकासाठी पोषक असे वातावरण तयारच झाले नाही. काजूला मोहर आला पण, तो करपून गेल्याने शेतकऱयांच्या पदरी निराशाच आली. काजू बागायतीची साफ-सफाई करण्यासाठी शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात कामगार वर्गाचा वापर केला. त्यांच्यावर खर्च केलेला पैसा सुद्धा यंदा भरून येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यात काजूला चांगला भाव मिळत नाही.
विदेशातून काजू आयात केला जात असल्याने स्थानिक काजूचा दर कोसळला आहे. अशा वेळी सरकारनेच यावर उपाय योजना आखावी अशी मागणी शेतकऱयांकडून होत आहे. गोव्याच्या सर्वच भागात काजूच्या बोंडापासून मिळणाऱया रसावर प्रक्रिया करून हुर्राक व फेणीची निर्मिती केली जाते. त्यामुळे शेतकऱयांना थोडाफार दिलासा मिळत असतो. पण, यंदा काजूचे पीकच घटल्याने हुर्राक व फेणीची निर्मिती करणे सुद्धा कठीण होऊन बसलेले आहे. त्यात ऐन वेळी पडलेल्या पावसाने देखील काजूचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांना जबरदस्त फटका दिलेला आहे.