वार्ताहर /जांबोटी
जांबोटी येथून नजीक असलेल्या मुडगई (ता. खानापूर) येथील शेतवडीत सोमवारी दुपारी अचानक आग लागून 200 काजू झाडे तसेच पत्र्याचे शेड व तीन ट्रॉली गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सुमारे अडीच लाख ऊपयांचे नुकसान झाले आहे. मुडगई गावापासून सुमारे दीड कि.मी.वर गोपिका गोपाळ भरणकर यांची सर्व्हे नं. 62 मध्ये 5 एकर शेतजमीन आहे. या जमिनीत काजूची झाडे लावली आहेत. सोमवारी दुपारी आग लागून फळधारणा झालेली सुमारे 100 काजूझाडे तसेच मागीलवषी लागवड केलेली वेंगुर्ला जातीची 100 काजू कलमे व जनावरांसाठी साठवून ठेवलेले सुमारे तीन ट्रॉली गवत जळून खाक झाले. शेतवडीतील पत्र्याचे शेड, त्यातील शेतीअवजारेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे गोपिका भरणकर यांचे सुमारे अडीच लाख ऊपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तहसीलदार व महसूल निरीक्षक व तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा करून त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.