भारतीय जनता पक्षाचे सभासद नसलेले लोक पदाधिकारी बनले आहेत. पदाधिकारी निवडीवेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी हस्तक्षेप केला आहे असा आरोप करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त्या मागे घ्याव्यात त्याशिवाय कोल्हापूरात येऊ नये असे मत भाजपचे जेष्ठ नेते बाबा देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच, समरजित घाटगे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पक्षात फूट पडायला सुरुवात झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेले काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यावरून पक्षांतर्गत कुरबूर पहायला मिळत आहे. पक्षातील अनेक जूने कार्यकर्त्यांनी नविन निवडीवर आपली नाराजीही व्यक्त केली आहे. हा संघ्रर्ष चालुका पातळीवर पोहोचून आजरा, गडहिंग्लज, आणि करवीर तालुक्यातही पोहोचला आहे.
आज भाजपचे जेष्ठ नेते बाबा देसाई यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन जुन्या आणि नाराज कार्यकर्त्यांच्या वतीने आपले मत मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “दोन महिन्यापुर्वी पक्षाची संघटनात्मक पुनर्रचना झाली. पण या नविन रचनेत पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना स्थान मिळावे. या निवडीमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा हस्तक्षेप केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. सध्याची परिस्थिती जर पाहीली तर हा पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना या नविन पदाधिकारी नियुक्त्या मागे घ्या, त्याशिवाय कोल्हापूरात येऊ नका असे आवाहन करणारे आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “50- 55 वर्ष भाजपचे काम करणाऱ्या जुन्या लोकांशी समन्वय साधण्याची पक्षाची यंत्रणा कुचकामी ठरली आहे. मंत्री चंद्रकांतदादा सारख्या लोकांनी अशा लोकांना डोक्यावर घेतलं आहे. निर्णयक निर्णय घेणारे नेते हवे आहेत. तसेच गेल्या तीन वर्षात समरजित घाटगे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर पक्षात फूट पडायला सुरुवात झाली. आमचं आयुष्य मातीत घालून यां पक्षासाठी काम केल. मात्र तो पक्ष मोडीत निघाला आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कानावर हा प्रकार घालणार असून यानंतरच या पुढचा निर्णय घोषित करणार आहे. यापुढे भारतीय जनता पार्टी बचाव हीच माझी भूमिका असणार आहे.” असा खुलासाही त्यांनी केला.