नंदगड गावच्या वर्दळीच्या रस्त्यांतून मुलांची पायपीट थांबणार : एसडीएमसीचे लक्ष वेधले
प्रतिनिधी /खानापूर
नंदगड (ता. खानापूर) गावातील मराठी मुला-मुलींच्या पहिली, दुसरी व तिसरी इयत्तेचे वर्ग गावाबाहेरील जेसीएस शाळेत भरत असल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीतून एक ते दीड किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे. अरुंद रस्त्यावरून वाहनांची मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अपघातांची शक्मयता असून लहान गटाचे तीन वर्ग ग्राम पंचायतजवळ असलेल्या मसूरकर गल्लीच्या कोपऱयावरील शाळा इमारतीत भरविण्यात यावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.
यावर्षी जुन्या इमारतीत वर्ग सुरू न झाल्याने काही पालकांनी आपल्या मुलांना संत मेलगे शाळेत पहिलीसाठी प्रवेश घेतला आहे. याचा त्या जुन्या इमारतीत भरणाऱया शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नंदगड मुख्य गावापासून जेसीएस शाळा दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जुने गाव, दुर्गानगर, मठ गल्ली, सराफ गल्ली, कुंभार गल्ली, भातकांडे गल्ली, गणपत गल्ली व इतर भागातील पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना गर्दीतून वाट काढावी लागते. ही समस्या ओळखून शाळेच्या स्थापनेपासून पहिल्या तीन इयत्तांचे वर्ग ग्राम पंचायतीजवळ असलेल्या सरकारी शाळेच्या इमारतीत भरविले जात होते. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली होती.
पालकांचा नाराजीचा सूर
कोरोना कालावधीनंतर सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षात मुला-मुलींच्या पहिली, दुसरी व तिसरी या इयत्तांचे वर्ग गावाबाहेर असलेल्या जेसीएस शाळेत भरविण्यात येत आहेत. मसुरकर गल्लीतील शाळेचे व्यवस्थापन जेसीएस शाळेच्या देखरेखीखालीच पाहिले जात होते. माध्यान्ह आहार, शिक्षक व सर्व सुविधा जेसीएस शाळेतूनच पुरवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीचे ठरत होते. यावर्षीच्याही शैक्षणिक वर्षापासून येथील इमारतीत वर्ग भरविणे बंद केले आहे. त्यामुळे पालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
नंदगड, हलशी, नागरगाळी मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे लहान मुले एक ते दीड किलोमीटर अंतर चालत जाताना अपघात अथवा अनाहूत प्रकार घडण्याची शक्मयता आहे. या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मसुरकर गल्लीच्या कोपऱयावर असलेल्या शालेय इमारतीतच पहिली, दुसरी व तिसरी इयत्तांचे वर्ग भरविण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. शाळा सुधारणा समिती आणि मुख्याध्यापकांनी या समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.