नवी दिल्ली
काही वेळा गरज नसतानाही सॅलरी खाते(वेतन खाते) किंवा अन्य काही कारणास्तव एकापेक्षा अधिकची बँक खाती लोकांना उघडावी लागतात. मात्र ंनंतरच्या कालावधीत काही कारणास्तव सदरच्या बँक खात्याचा वापर कमी होत जातो, परंतु खाते बंद केले जात नाही. यामुळेच संबंधीत बँक खातेधारकांना नुकसान सहन करावे लागते. याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.
कमीत कमी बॅलेन्स ठेवावा लागणार
बँक खात्यामध्ये एक महिन्यात सरासरी बॅलेन्स ठेवावा लागतो, यामध्ये 500 रुपयांपासून 15,000 रुपयापर्यंतचा समावेश यामध्ये होतो. कमीत कमी बॅलेन्स न ठेवल्यास बँक आपल्या पॉलीसीनुसार सदर खात्यामधून रक्कम वजा करत जाते. तसेच सॅलरी खात्यावर सलग तीन महिन्यांपर्यंत सॅलरी जमा न झाल्यास खाते सेव्हिंगमध्ये बदलले जाते.
डेबिटकार्ड आणि एसएमएसची फी
बँक आपल्या डेबिटकार्डवर काही फी आकारते. वर्षाच्या आधारे हे शुल्क 100 ते 1000 पर्यंत येते. मात्र खात्याचा वापर होत नसेल तर खातेदारांना डेबिटकार्ड फी भरावी लागेल. एसएमएससाठी बँक साधारण प्रति तिमाहीत 30 रुपये वसूल करते.
व्यवहार न केल्यास खाते होणार बंद
साधारणपणे 12 महिन्यांपर्यंत आपल्या बँक खात्यावर कोणत्याही प्रकारचा व्यवहार न केल्यास बँक खात्याला इनऍक्टिव्ह केले आहे, असे मानते. खात्यावर व्यवहार करण्यासाठी बँक मनाई करत नाही परंतु कोणत्याही डिमॅट खात्यावरुन आपल्या नेट बँकिंग, एटीएम व्यवहार किंवा मोबाईल व्यवहार करता येत नाही.
कर जमा करताना अडचण
निर्माण होऊ शकते
अधिकची बँकांमध्ये खाती असल्यास कर जमा करताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होऊ शकतात. यासोबतच इनकम टॅक्स रिटर्न भरताना ग्राहकांना सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागते.