प्रतिनिधी/ बेळगाव
जगद्गुरु श्री सिद्धारुढ स्वामींची पुण्यतिथी रुद्रकेसरी मठामध्ये आचरण्यात आली. हरिगुरु महाराजांच्या उपस्थितीत सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सत्यनारायण पूजा झाली. हरिगुरु महाराजांनी प्रवचन करताना सिद्धारुढ स्वामींचे आदर्श जीवन, त्यांच्या बाललीला, गृहत्याग, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांची भारतभ्रमंती व हुबळीत येऊन वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत त्यांनी केलेले लोककल्याण याबद्दल माहिती दिली.
यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद झाला. दिवसभर विविध कार्यक्रम, भजन, सामुदायिक नामस्मरण झाल्यानंतर सायंकाळी 7 च्या आरतीने उत्सवाची सांगता झाली.