कर्नाटक-गोवा सीमेवरील झाडानी-पेड्राल भागातील आग आणली आटोक्यात
उदय सावंत/ झाडांनी
गोवा कर्नाटक सीमेवर असलेल्या झाडांनी, पेड्राल या भागामध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सत्तरी तालुक्यातील तऊणांनी दिवसभर महत्त्वपूर्ण योगदान देऊन संपूर्ण आग विझविलेली आहे. यामुळे अशा तऊणांचा अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वप्रथम मोर्ले, देरोडे, कोपर्डे व झाडांनी व संबंधित भागामध्ये लागलेली आग विझविण्यात या युवकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले आहे. गेल्या दहा दिवसापासून सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आग लागत आहे. यामुळे सरकारी यंत्रणेची धावपळ उडालेली आहे. स्थानिक भागातील तऊणांनी सहकार्य करावे, असे वन खात्याचे अधिकारी, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व देविया राणे यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून तरुणांनी सर्वप्रथम मोर्ले येथील डोंगराला लागलेली आग पूर्णपणे विझविली. त्यानंतर कोपर्डे येथील डोंगरावर लागलेली आग स्थानिक ग्रामस्थ व तऊणांच्या सहकार्याने विझविली. दरम्यान, दोन दिवसापूर्वी झाडांनी पेड्राल भागामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले होते. याला अनुसरून निसर्गप्रेमी प्रदीप गवंडळकर यांनीही आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळी वाळपई कदंबा बसस्थानकावर शेकडे तऊणांची फौज जमा झाली. त्यांनी झाडांनी व पेड्राल भागामध्ये आगेकूच करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आग विझवण्यास सहकार्य केले.
झाडांनी पेड्राल भागात मोठी जंगल संपत्ती : गवंडळकर
झाडांनी व पेड्राल हा भाग अत्यंत संवेदनशील आहे. या भागामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती प्रचंड प्रमाणात आहे. जैवविविधतेमुळे या भागाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. दोन दिवसापूर्वी या भागांमध्ये आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी वनखात्याने चांगले कार्य केले तरीसुद्धा अनेक ठिकाणी आग जिवंत होती. ती विझविण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनुसरून मोठ्या प्रमाणात तऊणांनी यामध्ये भाग घेतला. याबद्दल प्रदीप गवंडळकर यांनी यांनी समाधान व्यक्त केले.
वनखात्याला सहकार्य करावे : लक्ष्मण गावस
प्रत्येक गावाच्या ठिकाणी आग लागत आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. यामुळे वनखात्याबरोबरच मंत्री विश्वजित राणे व आमदार डॉ. देविया राणे आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. तरीसुद्धा वनखात्याला प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे, असे या कार्यामध्ये योगदान देणारे लक्ष्मण गावस यांनी सांगितले.
निसर्ग रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची : गोपीनाथ गावस
पर्यावरण, निसर्ग रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पर्यावरणामुळे आज प्रत्येकाचे जीवन सुसह्य बनलेले आहे. यामुळे पर्यावरण अबाधित राखायचे असेल तर प्रत्येकाची योगदान महत्त्वाचे, असे गोपीनाथ गावस यांनी सांगितले. दरम्यान सत्तरी तालुक्यातील तऊणांमध्ये पर्यावरण रक्षणाचा मंत्र जागृत होऊ लागलेला आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये तऊण चांगल्या प्रकारे वन खात्याला सहकार्य करीत आहेत. येणाऱ्या काळातही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून गावाचे पर्यावरण व निसर्ग अबाधित राहणे हे अत्यंत गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या भागात उमटताना दिसत आहेत.