काँग्रेसचे नेते मेघश्याम राऊत यांची मागणी. तिळारी धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवावी.
डिचोली/प्रतिनिधी
तिळरी धरणातील पाण्यामुळे साळ व इतर गावांना बसणरा पुराचा तडाखा रोखण्यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारच्या जलस्रोत खात्यांमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गोव्यातील पावसाची आणि नद्यांनी परिस्थिती पाहूनच धरणातील पाणी सोडण्यात यावे. तसेच धरणाची पातळी पावसाचा अंदाज पाहून नियंत्रणात ठेवण्यात यावी. हे समीकरण राखल्यास भविष्यात साळ व इतर गावांमध्ये पुर येण्याची शक्मयता कमीच आहे. असे डिचोलीतील काँग्रेस पक्षाचे नेते मेघश्याम राऊत यांनी सांगितले. मेघश्याम राऊत यांनी डिचोलीतील पत्रकारांना घेऊन तिळरी धरणाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
सध्या तिळारी धरणाची पातळी नियंत्रणात आहे. ती एकदम भरून न घेता भविष्यातील पावसाचा अंदाज पाहून धरण भरून घ्यावे. त्यामुळे गोव्यातील पावसाची व पुराची परिस्थिती पाहून धरणातील पाणी समोरील नदीत सोडण्यास अनुकूल होईल. यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारच्या जलस्रोत खाते तसेच धरण अधिकाऱयांनी या बाबतीत एकमेकांच्या संपर्कात रहावे आणि समन्वय राखावा. अशी मागणी मेघश्याम राऊत यां?नी केली. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याविषयी गांभिर्याने लक्ष देताना तिळारी धरणातील पाण्याची व ते सोडण्यावर देखरेख ठेवावी. असा समन्वय साधून धरणातून ल पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवल्यास, तसेच परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडल्यास साळ, मेणकुरे धुमासे व पेडणेतील गावांना या पाण्यामुळे बसणारा पुराचा तडाखा कमी होणार. असेही मेघश्याम राऊत यांनी म्हटले.