वारंवार मागणी करूनही एल अँड टी कंपनी पाण्याच्या नव्या जोडण्या देत नसल्यामुळे अखेर नगरसेवक रवि साळुंखे यांनी स्वखर्चाने पाणी जोडणीची सोय केली. त्यामुळे लोकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 27 मध्ये बसवाण गल्ली आणि पवार गल्ली याठिकाणी अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या होती. याबाबत नगरसेवक रवि साळुंखे यांनी एल अँड टी कंपनीकडे तक्रार केली होती. लोकांना नव्या जोडण्या देण्याची मागणी केली होती. पण कंपनीने नव्या जोडण्या देण्याचे काम बंद असल्याचे सांगितले. नगरसेवक साळुंखे यांनी त्यामुळे स्वखर्चाने जोडण्या खालून दिल्या. त्यासाठी एल अँड टी कंपनीने जुनी गाजलेली वाहिनी बदलून नवी वाहिनी घातली. पाणी समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक रवि साळुंखे यांनी घेतलेल्या पुढाकाराबाबत कौतुक करण्यात येत आहे.
Trending
- येत्या निवडणुकीत जनतेने भाजपला योग्य जागा दाखवावी !
- पेंडूर युवासेना शाखाप्रमुख पदी राजू पेंडूरकर, महेश परब यांची निवड
- विभागप्रमुख हे भाजपने स्वतःच ठरवून प्रवेशापुरते दिलेले पद
- मोर्लेत हत्तींकडून दोन महिलांचा पाठलाग
- पंतप्रधान आज बेळगावात, उद्या सकाळी सभा
- पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 14 जखमी
- पंतप्रधान मोदींकडून कर्नाटकवर अन्याय
- शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन