वसंत गायकवाड, सीताराम सावंत आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांना ग्रंथ पुरस्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे 2022 मधील ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले आहेत. वसंत गायकवाड, सीताराम सावंत, आबासाहेब पाटील, कविता ननवरे यांच्या पुस्तकांची निवड ग्रंथ पुरस्कारासाठी झाली आहे. 25 मे रोजी सकाळी 10.30 वाजता शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती दमसासचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2022 या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. गोपाळ गावडे, सुनील इनामदार, गौरी भोगले यांनी काम पाहिले.
पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे
देवदत्त पाटील पुरस्कार : वसंत गायकवाड – तथागत गौतम बुध्द (कादंबरी), शंकर खंडू पाटील पुरस्कार : जयवंत आवटे – बारा गावचं संचित (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार : सीताराम सावंत – हरवलेल्या कथेच्या शोधात, कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कार : विनायक होगाडे – डिअर तुकोबा (संकीर्ण), शैला सायनाकर पुरस्कार : आबासाहेब पाटील – घामाची ओल धरून (कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन) – सगळेच ऋतू दगाबाज – कविता ननवरे (कवितासंग्रह), बालवाड्मय पुरस्कार – गांडूळाशी मैत्री – वंदना हुळबत्ते.
विशेष पुरस्कार : संत गाडगेबाबा समग्र ग्रंथ – रा. तु. भगत, राजर्षी शाहू आणि भटके विमुक्त – व्यंकाप्पा भोसले, जीवनरंग – अच्युत माने, पाषाणपालवी – बी. एम. हिर्डेकर, लढवया – सुभाष ढगे-पाटील, ऑनलाईन शिक्षण पद्धती – गणपती कमळकर, सत्य असत्याशी मन केले ग्वाही – प्रशांत गायकवाड, रे आभाळा – रामकली पावसकर, आदिवासी कवितेचा परामर्श – गौतम जाधव, संचित – प्रकाश काशीद, आवडलं ते निवडलं – अभिजीत पाटील, थेंबातला समुद्र – वैष्णवी अंदुरकर, बाभूळमाया – विकास गुजर, कोल्हापूरचे महापौर – गुरुबाळ माळी/आप्पासाहेब माळी/सतीश घाटगे, सुलवान – मेघा रमेश पाटील, वर्तुळाच्या आतबाहेर अस्वस्थ मी – राजेंद्र शेंडगे, कपडे वाळत घालणारी बाई – हर्षदा सुंठणकर, ऐहिकाच्या मृगजळात – पूजा भडांगे, शाळा सुटली – प्रणिता शिपुरकर, पकाल्या – खंडेराव शिंदे, चैत्रायन – शैलजा टिळे – मिरजकर, वंचितांचे अंतरंग – अशोक बापू पवार, गझल साया – सिराज शिकलगार.