करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांची अशीही कृतज्ञता
कार्यालयाबाहेर लावला फलक : उपक्रमाचे होतेय कौतुक
कोल्हापूर प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर छातीचा कोट कऊन लढणारा सैनिक प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्याप्रती प्रत्येकजण कृतज्ञता व्यक्त करत असतोच. अशीच कृतज्ञता करवीरचे नूतन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही कामासाठी कार्यालयात प्राधान्य राहील, अशा आशयाचा फलक लावला आहे. या माध्यमातून सैनिकांप्रती असलेला आदर दिसून येत आहे. या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी काही दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे कार्यरत होते. त्यांनी पदभार घेतल्यानंतर पहिलेच कौतुकास्पद पाऊल उचलले. शाहूपुरीतील बी. टी. कॉलेज येथील करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेर एक अभिनव फलक लावला. त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
त्या फलकावरील मजकूरामध्ये म्हंटले आहे की, ‘भारतीय सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या जवानांचे तसेच त्यांच्या कुटूंबियांचे या कार्यालयात काही शासकीय काम असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. आपले काम प्राधान्याने करणे हे माझे कर्तव्य समजतो. देशसेवेसाठी आपण जे कार्य करत आहात त्याचा मला सार्थ अभिमान आहे.’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांबरोबर येथे येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष या फलकावर पडल्यानंतर तहसीलदारांप्रती अभिमानाने उर भऊन आला तर नवल वाटायला नको. कारण सैनिक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून कोण अशा पध्दतीने उपक्रम राबवत असेल तर त्याचे कौतुक हे होणारच. तहसीलदार रावडे यांनी मंगळवेढा येथे कार्यरत असतानाही अशाच पध्दतीने उपक्रम राबविला होता. यावऊन त्यांचे सैनिकांप्रती असलेले प्रेम अधोरेखित होत आहे.
सैन्यामध्ये जाण्यासाठी आपण तयारी करत होतो. परंतु त्याला यश आले नाही. आपल्याला सैन्यात जायला मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याप्रती असलेले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची कामे प्राधान्याने करण्याचे ठरविले. त्यानुसार आपण हा फलक कार्यालयाबाहेर लावला आहे. सैनिक व त्यांच्या कुटूंबियांनी कोणतेही शासकीय काम असेल तर थेट आपल्याशी संपर्क साधावा.
स्वप्निल रावडे, तहसीलदार, करवीर