शेतकऱयांच्या जीवाला धोका, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
हंदिगनूर-म्हाळेनट्टी संपर्क रस्त्याला लागून असलेल्या शिवारात एका बाजूला कलंडलेले वीजखांब आणि वीजवाहिन्या धोकादायक ठरू लागल्या आहेत. हेस्कॉमने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱयांनी तक्रारी देऊनही अद्याप वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
या संपर्क रस्त्याला लागून असलेल्या शिवारात काही ठिकाणी वीजखांब पूर्णपणे एका बाजूला कलंडले आहेत. त्याबरोबर खांबांवरील विद्युतवाहिन्या हात पोहोचतील इतक्या अंतरावर खाली लोंबकळत आहेत. त्यामुळे शेतकऱयांना शेतीत काम करणे धोक्मयाचे बनले आहे. शिवाय ये-जा करणे आणि जनावरांनाही धोका बनला आहे.
खरीप हंगामातील पेरणी आणि लागवडीसाठी शेतकऱयांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे शिवारातील विद्युतखांब शेतकऱयांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. शिवारात लोंबकळणाऱया विद्युत वाहिन्यांमुळे शिवारातील कामे भीतीच्या छायेखाली करावी लागत आहेत. शिवाय जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. नकळत शेतकरी किंवा जनावराचा स्पर्श झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. शिवारात असलेल्या उसाच्या पिकातूनच या तारा गेल्या आहेत. त्यामुळे शेतात पेरणी, लागवड आणि इतर कामे करताना स्पर्श होऊ शकतो. हेस्कॉमने गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत खांब आणि वीज वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.