बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी मतदारसंघात जोरदार प्रचाराची मोहीम हाती घेऊन जुने बेळगाव, राघवेंद्र कॉलनी परिसरात प्रचारफेरीद्वारे मतदारांना काँग्रेसला मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याची विनंती केली. यावेळी या परिसरातील नागरिकांनी आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी असून निवडून देण्याचे आश्वासन दिले. काँग्रेसचे मत म्हणजे विकासाला मत, हे लक्षात घेऊन भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती प्रभावती मास्तमर्डी यांनी केली. पाच वर्षाच्या आदेशासाठी एक मौल्यवान मत आहे. नागरिकांना सरकार अपयशाबद्दल सांगतात, किंमती वाढतात, गैरसमज तसेच काँग्रेस पार्टी गुळगुळीत होईल आणि पाच लोकप्रिय हमी देणार नाहीत, अशा टीका विरोधकांनी काँग्रेस पार्टीवर जनतेसमोर केल्या आहेत. या टीकांवर लक्ष न देता काँग्रेसच्या हाताला प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन केले.
काँग्रेस येणार आहे या गोष्टीची साक्ष या निवडणुकीत दिसून येईल. सध्या विविध भागात प्रचारमोहीम राबविण्यात येत असून जुने बेळगाव परिसरात लक्ष्मी गल्ली, खन्नूकर गल्ली, बस्ती गल्ली, गणेशपेठ, कोरवी गल्ली, मरगाई गल्ली, कुलकर्णी गल्ली, गणेशपेठ या परिसरात घरोघरी जाऊन काँग्रेसला मत देऊन पाच वर्षे सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. परिसरातील सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेन. सायंकाळी खासगी राघवेंद्र कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन काँग्रेसला मत देण्याची विनंती केली. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, योग्य रस्त्यांचा अभाव याबाबत मत मांडले. काँग्रेस पक्षाची सत्ता राज्यात आली तर मतदार संघाचा विकास शक्य असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या ध्येयधोरणांची माहिती देऊन निवडणुकीत काँग्रेसला भरघोस मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. वाढती महागाई त्याचप्रमाणे नवनवीन अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही. केवळ स्मार्ट सिटी बनवून विकास होत नसून नागरिकांच्या समस्या पाहणे गरजेचे आहे. हे काम सध्याच्या सरकारने केले नसल्याचे प्रभावती मास्तमर्डी यांनी सांगितले.