अखिल भारतीय ओबीसी महासभेतर्फे ओबीसी जागृतीचे काम. सर्व समाजांकडून उत्स्फूर्त पाठिंबा व सहकार्य. अध्यक्ष शशिकांत घाडी यांची माहिती.
डिचोली/प्रतिनिधी
राज्यात अखिल भारतीय ओबीसी महासभेचे काम सुरू होऊन अडीच वर्षे झाली. या अडीच वर्षांमध्ये या महासभेतर्फे गोव्यात ओबीसीमध्ये येणाऱया सरँव समाजांना जागृत करण्याचे काम केले आहे. या महासभेत गोव्यातील सर्व ओबीसीमध्ये येणाऱया समाजाचा समावेश असून येत्या सप्टेंबर महिन्यात डिचोली तालुका ओबीसी महामेळावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती या ओबीसी महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डिचोली येथे पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्य समन्वयक पंकज नमशीकर, सचिव सत्यवान हरमलकर, मनोजकुमार घाडी, डिचोलीच्या नगरसेविका अँड. रंजना घाडी, श्रीपाद कुंभारजुवेकर, मोहन आमोणकर, संतोष गावकर, जयदीप च्यारी, समीर वायंगणकर, रविराज च्यारी व इतरांची उपस्थिती होती.
आज ओबीसीवर पंचायत निवडणुकींमध्ये होणारा अन्याय सर्वश्रुत आहे. या संदर्भात राज्य सरकारला एक निवेदन सादर करून या महासभेने राज्यातील ओबीसी समाज आणि ओबीसी लोकसंख्येची सर्व्ह? करावी अशी मागणी केली होती. परंतु सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आज जर ती सर्व्ह? करून अहवाल तयार केला असता तर हि परिस्थिती उदभवली नसती. तरीही आज झालेल्या गोंधळात ओबीसीवर अन्याय होऊ नये, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. त्यावर सरकारने लवकरच नवीन अधिसुचना येणार असल्याचे सांगितले आहे. जर या निवडणुकीत ओबीसींवर अन्याय झाला तर राज्यातील सर्व ओबीसी संघटना एकत्रित येऊन ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार, असा इशाराही यावेळी अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी दिला. या ओबीसी महासभेतर्फे ओबीसी जागृतीचे काम होत आहे. महामेळाव्यातून सर्व समाजांना एका व्यासपीठावर आणणे आणि एकमेकांची ओळख पटवून देणे. तसेच ओबीसीच्या विविध समस्या विषयांवर चर्चा करणे, हे कार्य केले जाते. सध्या असलेली ओबीसी महासभेची समिती 17 जुलै रोजी बरखास्त होणार असून त्यानंतर राज्याची नवीन समिती निवडली जाणार आहे. त्यात नवीन युवा.व.सक्रिय सदस्यांना कार्य करण्याची संधी दिली जाणार आहे, असेही शशिकांत घाडी यां?नी सांगितले.
गोव्यात अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेले ओबीसी महासभेचे कार्य आज मोठे स्वरूप घेत आहे. समाज आणि संघटना बळकट करण्याचे काम या महासभेच्या माध्यमातून होत असून राजकारण आणि समाज यातील संभ्रम दूर करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे. ध्येय बाळगून कार्य केल्यास किहीच अशक्मय नाही याचा प्रत्यय या कामातून येत आहे. लोकांना एकत्रित करण्यासाठी काणकोण येथे व नंतर तिसवाडीत घेतलेल्या मेळाव्यांना मोठा प्रतिसाद लाभला. आता डिचोलीत मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यातून युवा व महिलां?ना विशेषतः जागृत करण्याचे उद्दिष्ट आहे, असे राज्य समन्वयक पंकज नमशीकर यांनी सांगितले. मनोजकुमार घाडी यांनी ओबीसी महासभेच्या कार्याची माहिती दिली.