प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी कृष्णा काठावरील यापूर्वी पावसाळय़ात पुराचा फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. चिकोडी व कागवाड तालुक्मयातील नदीकाठावरील गावातील नागरिकांशी त्यांनी चर्चा केली.
सुरुवातीला मांजरी पुलाला भेट देऊन कृष्णा नदीत पाण्याचे प्रमाण किती वाढले, याची पाहणी केली. त्यानंतर येडूर, इंगळी, कागवाड तालुक्मयातील मंगावती, जुगूळ या गावांना भेटी दिल्या. 2019 व 21 च्या पुरात कोणती गावे पाण्याखाली गेली होती, याविषयी गावकरी व अधिकाऱयांकडून माहिती घेतली.
पावसाळय़ाला सुरुवात होत आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर शेजारच्या राज्यातून पाणी सोडले जाते. पावसाचे प्रमाण व नदीच्या पात्रात साठणारे पाणी यावर सातत्याने अधिकाऱयांनी लक्ष ठेवावे. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठावरील नागरिक, जनावरांचे जीव वाचविण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना त्यांनी केली.
यासंबंधी जिल्हाधिकाऱयांनी जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱयांशी चर्चा करून यापूर्वीच त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. गंजी केंद्रांसाठी स्थळनिश्चिती करावी. पुराच्यावेळेला जीवरक्षणासाठी बोट सज्ज ठेवावी. चिकोडीत भरपूर बोटी आहेत. तरीही अतिरिक्त बोटींची व्यवस्था करावी. जुन्या बोटी दुरुस्त करून घ्याव्यात, अशा सूचना देत पाणी मोजणी केंद्रालाही त्यांनी भेट दिली.
नदीकाठावरील गावकऱयांशी चर्चा करून संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. गावकऱयांनी प्रशासनाकडून येणाऱया सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी संतोष कामगौड उपस्थित होते.