विविध साहित्यांनी दुकाने सज्ज, ग्राहकांची वर्दळ : शहरात किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार, बालचमू किल्ले बनविण्यात गर्क
प्रतिनिधी /खानापूर
आजपासून सुरू होणाऱया दीपावली सणाच्या उत्सवाला पारंपरिक सुगीतील महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. आजपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या खरेदीसाठी रविवारी दिवसभर खानापूरच्या बाजारात एकच गर्दी झाली होती. विशेषतः आकाश कंदील, पणत्या, रांगोळी आदी वस्तू खरेदीकडे ग्राहकांचे विशेष लक्ष होते.
घरोघरी लक्षवेधक दिव्यांनी चैतन्यमय वातावरण बनले आहे. लक्ष्मीपूजन सोमवारी आहे. दीपावली सण म्हणजे सुगीचा सण मानला जातो. धनत्रयोदशीच्या प्रवाहावर अनेकांनी सुवर्णकारांकडे काहीनी सोने-चांदी खरेदी केली आहे. अनेक सराफ पेढय़ांवर महिलांची गर्दी दिसून आली. घरोघरी दारापुढे लक्षवेधी रांगोळी व दिव्यांची आरास केलेली दिसून येत आहे. यावर्षी सोमवारीच अमावास्या व लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आला आहे. प्रत्येक व्यावसायिकाने आपापल्या ठिकाणी लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू केली आहे. मंगळवार दि. 25 रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. शिवाय बुधवार दि. 26 रोजी बलिप्रतिपदा पाडवा व भाऊबीज आहे. या दिवशी बहिणीकडून भावाला आरती ओवाळण्यात येते.
रांगोळी, पणत्या खरेदीकडे कल
बाजारपेठेत दिवाळीसाठी फुले, मूर्ती व तसेच फळांची दुकाने सजली असली आहेत. खानापुरच्या बाजारात रविवारी एकच गर्दी झाली होती. दीपावलीला लागणाऱया मातीच्या पणती खरेदी तसेच रांगोळीसह खरेदीसाठी गर्दी झाली होती. खानापूर तालुक्मयामध्ये दीपावलीचा सण हा उत्साहात साजरा केला जातो. दीपावलीच्या सणात सुगीचे हंगाम असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक दीपावली साजरी करत सुगीलाही अधिक महत्त्व देतात.
गल्लोगल्ली किल्ले
![](https://tarunbharat.com/wp-content/uploads/2022/10/23-khp4-770x1024.jpg)
दिवाळीचा सण आला की शहर व ग्रामीण भागामध्ये बालचमू किल्ले उभारणीच्या तयारीला लागतात. यावर्षीही शहरात गल्लोगल्ली किल्ले बनवण्यात आले असून किल्ल्याच्या प्रतिकृती पूर्ण झाल्या असून बालचमूनी मोठय़ा उत्साहात या किल्ल्याचे उद्घाटन देखील केले आहे. किल्ल्यांची माहिती सांगण्यासाठी बालचमूनी तयारी केली आहे. त्यामुळे गल्लीमधून बालचमूंचा गलका दिसून येत आहे. बालचमू गड-किल्ले संवर्धनाच्या जनजागृतीचे काम करतात. तसे त्यांना प्रोत्साहन मिळते. हिंदू संस्कृतीच्या जतनाप्रमाणे ग्रामीण व शहरी भागात या दिवाळी सणाचे जल्लोषी स्वागत करण्यात येते. दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी, रोषणाई, उल्हास, प्रेम आणी फराळाची मेजवाणी असलेला मानला जातो. अंधाऱया रात्रीत शेकडो पणत्या प्रकाशाने घर उजळून टाकतात. जणू धरतीवर तारे अवतरल्याचा भास वाटतो. ती दिवाळी देशभरात मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. पण दिवाळीत मातीच्या पणत्यांमध्येच तेल घालून दिवे लावण्याची पद्धत आजही आपल्या देशात आहे. त्यामुळेच मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. तालुक्यातील फुलेवाडीसह सिंगीनकोप, गर्लगुंजी, विश्रांतवाडी, घोटगाळी, नंदगड, गोधोळी, निट्टूर आदी गावातील कुंभारकलेतील मातीच्या वस्तूना आजही बाजारात मोठी मागणी आहे.