बागायती पाण्याअभावी करपल्या
वाळपई : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. त्याचे विपरित परिणाम सत्तरी तालुक्यातील शेती बागायती व कुळागारावर झाले आहे. पाण्याची पातळी खाली गेली आहे. यामुळे शेती बागायती व कुळागारांना पाणी मिळणे मुश्किल बनलेले आहे. यामुळे गेल्या सुमारे वीस दिवसांपासून पाणी नसल्यामुळे बागायती करपण्याच्या मार्गात आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
वीस दिवसांपासून पाणी नाही
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वीस दिवसांपासून शेती बागायती कुळागाराना यंदा पाणी उपलब्ध झालेले नाही. यामुळे अनेक भागातील कुळागारे करपून गेल्याचे निदर्शनास आलेले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी अनेक वेळा पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले होते. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे.
कृष्णापूर भागात नदीपात्र कोरडे
म्हादई नदीचा प्रवास ज्या भागातून सुरू होतो त्या कृष्णापूर भागातही नदीचे पात्र कोरडे पडले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून उपलब्ध झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत अशी पातळी घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उपसा योजना 20 दिवसांपासून बंद
सत्तरी तालुक्यातील अनेक नद्यांवर जलसिंचन खात्यातर्फे उपसा योजना राबविण्यात आलेले आहेत. मात्र पाण्याची पातळी घसरल्यामुळे वीज दिवसांपासून उपसा योजना पूर्णपणे बंद झाल्या आहेत. जलसिंचन खात्याने बंधाऱ्यांच्या फळ्dया काढून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची पातळी खुपच खाली गेल्यामुळे उपसा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. यामुळे कृषी बागायतदारांसमोर मोठे समस्या निर्माण ^ााली आहे.
कर्नाटकचे कारस्थान यशस्वी झाल्यास दुष्परिणाम
गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच कृष्णापुर नदी पूर्णपणे आटलेली आहे. यामुळे बागायतीने पाणी मिळणे दुरापास्त बनलेले आहे. यामुळे याचा विपरित परिणाम कृषी बागायतीवर होताना दिसत आहे. कर्नाटक सरकार आपल्या म्हादईवरील कारस्थानात यशस्वी झाल्यास आगामी काळात अशा प्रकारचे दुष्परिणाम सातत्याने पहावयास मिळणार आहेत, अशी प्रतिक्रिया कृष्णापूर येथील महादेव गावकर यांनी व्यक्त केले.
शेती बागायतींवर गंभीर परिणाम!
यंदा म्हादई नदीच्या पाण्याचे पातळी कमालीची उतरलेली आहे. पावसाचे अद्याप चिन्ह दिसत नाही. यामुळे शेती बागायतीवर परिणाम होत आहेत.. उपसा योजना पूर्णपणे बंद झालेले आहेत. बंधाऱ्यांच्या फळ्या काढून पाण्याचा साठा नदीच्या खालच्या भागांमध्ये सोडण्यात आलेला आहे. बंधाऱ्यातील पाणीही आटले त्यामुळे शेती बगायतीवर गंभीर परिणाम होण्याची भीती धावे येथील गोविंद गावकर यांनी व्यक्त केली