राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या ऊस दर नियंत्रणमंडळावर स्वाभिमानी सह राज्यातील एकाही शेतकरी संघटनेच्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यापुर्वी या मंडळावर राजू शेट्टी, रघूनाथदादा पाटील आणि सदाभाऊ खोत हे सदस्य होते. यंदा मंडळावरून त्यांना डवलण्यात आले आहे.
राज्य उसदर नियंत्रण मंडळावर अशासकीय आणि शासकीय अशा पद्धतीने या मंडळावरून नियुक्त्या केल्या जात होत्या. दरम्यान मागच्या कित्येक वर्षांपासून ऊस दराच्या मुद्दावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी शासनाला जाब विचारला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांना या ऊस दर नियंत्रण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु काल राज्य सरकारकडून या नियंत्रण मंडळात शेतकरी नेत्यांना डच्चू देण्यात आल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.
13 जुलै रोजी झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळावरील फेरनियुक्तीमध्ये राज्य सरकारने अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांना मंडळातून काढून टाकण्यात आले आहे.
गेल्या ११ महिन्यांपूर्वीच्या राज्यातील सत्तातरानंतर १० ऑगस्ट २०२२ रोजी ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. या मंडळावरील अशासकीय प्रतिनीधींची पुन्हा नियुक्त्या करण्याबाबत राजू शेट्टी यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी पाठपुरावा केला होता. परंतु काल झालेल्या नियुक्त्यांमध्ये एकही शेतकरी नेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.