ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे गटाचे चार आमदार आमच्या संपर्कात असून, ते केव्हाही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पुण्यात केला.
केंद्र सरकारच्या वतीने देशात काही तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आली. पुण्यात राणे यांच्या हस्ते ‘यशदा’ येथे तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता केवळ मातोश्री पुरते मर्यादित राहिले आहे. त्यांच्याकडे केवळ सहा ते सात आमदार असून, त्यापैकी चार जण आमच्या संपर्कात आहेत. ते कधीही आमच्याकडे येतील.
अधिक वाचा : पुण्यात हॉटेलला आग; 6 वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू
भास्कर जाधव यांनी त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे राज्य सरकारचा अप्रत्यक्ष हात असल्याचा आरोप केला होता त्यावर ते म्हणाले, पुण्यातील लोकांना यासंर्भात जास्त माहिती आहे. मी कोकणात राहतो. परंतु जाधव यांनी भाषणामध्ये केलेली टिंगल, मस्करी हा काय चांगला गुण नाही. तुमच्या मुलांकडूनही राजकीय आरोप केले जातात, असा प्रश्न करताच राणे यांनी या प्रश्नाला बगल दिली.