हिंदू जनजागृतीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यापूर्वी बेळगावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाचे उद्घाटन केले होते. त्यामुळे बेळगावच्या या परंपरेला 120 वर्षे होत आहेत. तेव्हा प्रत्येकाने आध्यात्मिक पद्धतीने तसेच धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करावी आणि विसर्जन करावे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता ही मिरवणूक काढावी तसेच जिल्हा प्रशासनानेही जनजागृती करावी, यासाठी हिंदू जनजागृतीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
शहरामध्ये मोठय़ा संख्येने सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र बऱयाचवेळा काही मोजक्मया व्यक्तींमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते. हिंदू शास्त्रानुसार गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, त्याच्यासाठी योग्य व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये याकडेही लक्ष द्यावे, अस्वच्छ ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, कचरा गटारीमध्ये टाकला जातो; तो टाकू नये, गणेशपूजनासाठी दुर्वा, हार, फुले वापरण्यात येतात; ते कोठेही टाकू नये, योग्य ठिकाणी त्याचे विसर्जन करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी हिंदू जनजागृतीचे सुधीर हेरेकर, मारुती सुतार, अक्काताई सुतार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.