वाहने जाग्यावर थांबून : कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
बेळगाव : ग्रामीण भागातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला देण्यात आलेली कचरावाहू वाहने चालकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. या कचरावाहू वाहनांवर चालक कधी मिळणार? असा प्रश्नदेखील सर्वसामान्यांना पडला आहे. ग्रामीण भागातील कचरा संकलनासाठी ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहने देण्यात आली आहेत. मात्र या वाहनांवर चालक मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे ही वाहने वापराविना पडून असलेली पहायला मिळत आहेत. शासनाने कचऱ्यांसाठी लाखो ऊपये खर्चून वाहने उभी केली. मात्र या वाहनांवर चालक कोण देणार? असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. राज्यातील 5844 हून अधिक ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. या वाहनाद्वारे गावातील कचरा संकलन होणार आहे. दरम्यान प्रत्येक ग्राम पंचायतीला एक वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. मात्र ही वाहने चालविण्यासाठी चालक नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कचरावाहू वाहने ग्राम पंचायतींच्यासमोर वापराविना थांबून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वाहनांवर चालक नेमून कचरा संकलन करावे, अशी मागणीदेखील ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
घ्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ओल्या व सुक्मया कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या वाहनांची मदत होणार आहे. या वाहनाद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन केला जाणार आहे. मात्र या वाहनांवर चालकच मिळत नसल्याने वाहने धूळखात पडली आहेत. शिवाय संकलन केलेल्या कचऱ्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत क्षेत्रात व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी पाच ते दहा एकर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. मात्र याकडेदेखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे संकलन केलेला कचरा कोठे टाकणार? असा प्रश्नही ग्राम पंचायतींना पडला आहे. य् ाा कचरावाहू वाहनांवर चालक म्हणून महिलांना प्राधान्य दिले जाणार होते. विशेषत: महिला स्व-साहाय्य गटांची मदत घेतली जाणार होती. शिवाय कचरा व्यवस्थापन वाहन चालविणे आणि स्वच्छतेची जबाबदारी स्व-साहाय्य गटावर राहणार होती. शिवाय जिल्हा पंचायतीतर्फे स्व-साहाय्य गटाच्या महिलांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार होते, मात्र या साऱ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कचरा वाहनेदेखील अद्याप एकाच जाग्यावर थांबून असलेली दिसत आहेत.