ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जेजुरीकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले.
जेजुरीच्या मार्तंड देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळामध्ये स्थानिकांना डावलून सत्ताधाऱयांनी आपल्या मर्जीतील लोकांना संधी दिली आहे. या विश्वस्त मंडळातील तिघे वगळता इतर चौघे हे पुरंदर तालुक्याबाहेरील आहेत. या विश्वस्तांच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून जेजुकरांनी आंदोलन छेडले आहे. जेजुरीकर या निर्णयाच्या विरोधात विविध आंदोलन, राजकीय नेते आणि न्यायालयाच्या माध्यमातून दाद मागत आहेत. आज सकाळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, मनसे चे तालुका अध्यक्ष उमेश जगताप, नगरसेवक अजिंक्मय जगताप, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ईश्वर दरेकर, कृष्णा कुदळे, निलेश जगताप यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन त्यांना आंदोलनाबाबत माहिती दिली. मागण्यांचे निवेदन ही ठाकरे यांना देण्यात आले.
दरम्यान, विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. मात्र राज्याचे न्यायविधी मंत्री खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्याशी बोलून जेजुरीकरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.