ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्रातील मराठा कुणबी आहे, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे मराठय़ांना ओबीसीमधून आरक्षण द्या. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाहे, असे आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
कडू म्हणाले, ज्या मराठा समाजाच्या सरकारी दफ्तरी कुणबी म्हणून नोंदी आहेत. त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यास सरकारने सुरू करावे. कुणबी असणाऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं जात आहे. मराठा हा कुणबी आहे, हे सूर्य प्रकाशाइतकं सत्य आहे. त्यामुळे मराठय़ांना ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे. सरकारने त्यांचा अंत पाहू नये. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही.
विदर्भातील सगळे मराठा हे ओबीसीमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 75 टक्के मराठा हे ओबीसी आहे. फक्त आठच जिह्यासाठी विरोध का होत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.