भाविकांनी घेतला मांसाहारी आहाराचा आस्वाद, भाविक जपताहेत शेकडो वर्षांची पंरपरा
उदय सावंत/प्रतिनिधी
आपल्या समाजाची पारंपरिक संस्कृतीची बांधणी वेगवेगळय़ा लोकसंस्कृतीच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. यामुळेच आपला समाज आजही एका विशिष्ट धारणेतून सावरत आलेला आहे. सत्तरीतील गोळावली गावातील पारंपरिक भुगत सोहळा नुकताच भाविकांच्या उपस्थितीत मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. गावाला लाभलेल्या पंरपरेतील हा महत्त्वाचा भाग असून दरवर्षी दोन वेळा सदर धार्मिक उत्सव साजरा करण्याची पंरपरा या गावाला लाभलेली आहे.
गोळावली गावाला सिद्धेश्वर देवाचे अधि÷ान लाभले आहे. या देवाच्या भेटीसाठी जाण्याची ही पंरपरा आहे. गावापासून 3 कि.मी.अंतरावर असणाऱया जागेत रविवारी अशाच प्रकाराचा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यात बहुसंख्येने गावातील तसेच इतर भाविक सहभागी झाले होते.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कैक वर्षांपूर्वी गावच्या लोकवस्तीपासून अवघ्या अंतरावर असलेल्या देवराईत श्री सिद्धेश्वर देवाचे वास्तव होते. त्यावेळी त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी एक गावकर रोज त्याला जेवण पुरवत असत. एकेदिवशी याबाबत गावकराच्या पत्नीला संशय आल्याने त्यांनी आपल्या नवऱयाच्या मागोमाग जावून याबाबत शहनिशा करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची कुणकुण सिद्धेश्वर योगी पुरुषाला लाभल्यानंतर त्यांनी येथून आपले स्थान हलविले व आता ज्याठिकाणी भाविक मंडळी भुगत हा सोहळा साजरा करतात त्या ठिकाणी जाणे पसंत केले. देवराईतून जाताना त्यांनी सदर गावकऱयाला सांगितले की, आपण याठिकाणी वास्तव्य करु शकत नसल्यामुळे एका निर्मुनष्य अशा पेडीत राहणार आहे. वर्षाला दोन दिवस आपण भाविकांना दर्शन देणार असल्याचे त्यांनी सागितले अशी आख्यायिका रुढ आहे.
त्याप्रमाणेच भाविक वर्षातून दोनवेळा तेथे जाऊन धार्मिक व पारंपरिक पद्धतीने भुगत साजरा करतात. सदर ठिकाणी मोठी दगडाची गुहा आहे, त्याला सिद्धेश्वराची पेड असे म्हटले जात आहे. याबाबत अधिक माहिती देतांना गावकऱयांनी सांगितले की दरवषी जानेवारी व जुलै महिन्याच्या पाहिल्या रविवारी सदर परंपरा साजरी करण्याची प्रथा रुढ आहे. यदांचा हा सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. यात मोठय़ा संख्येने भाविक सहभागी झाले होते. महत्त्वाचे म्हणजे यावेळी एका कळसाचे पुजन करण्यात येत असते. सदर कळस स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सदर कळस या धार्मिक परंपरेची साक्ष देणारा आहे. सदर कळस मातीचा असल्यामुळे तो बदलण्यासाठी अनेक वेळा कौलप्रसाद घेण्यात आला मात्र कौल न झाल्याने आजही याच कळसाचे पुजन करून तो याच ठिकाणी सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात येत असतो.
वर्षाला दोनवेळा साजरी करण्यात येणारा हा सोहळा म्हणजे एकप्रकाचा सिध्देश्वर देवाच्या प्रगटिकरण सोहळय़ाचा भाग असल्याचे नागरिकाचंचे म्हणणे आहे.
या सोहळय़ाच्या नतंर मासांहारी भोजनाचा लाभ पारंपरिक पद्धतीने घेण्यात आला. यावेळी अधिक माहिती देताना नागरिकांनी सांगितले की, सिद्धेश्वर हा योगी पुरुष होता तर मासांहारी जेवणाची मेजवानी त्यांच्यासाठी नाही तर त्याच्या सोबत वास्तव करणाऱया काळभैरव या राखणदारासाठी असल्याची वाच्यता असल्याचे सागण्यात येते.