मिरचीचे दर किंचित ओसरले, तरीही तिखटच. बांदा, जांबोटी, काणकोणची मिरची स्वस्त. सुक्मया मासळीसाठी गर्दी. आमसुले, चवळी, हळसांदे, फजावाची मोठी खरेदी. गावठी उकडय़ा तांदळालाही मागणी.
रविराज च्यारी/ डिचोली
मे महिना म्हटल्यावर संपूर्ण गोव्याला आणि गोवेकरांना पावसाच्या आगमनाची आतुरता लागून राहिलेली असते. यावेळी पावसाचा मारा पूर्ण वर्षभर आहे हि बाब वेगळी. मात्र या महिन्यात गोवेकर पावसाळी बेगमीसाठी बाजारात न चुकता जातात. सध्या प्रत्येक तालुक्मयात आणि शहरात भरणारे आठवडी बाजार हे “पुरूमेताचे”च बाजार म्हणून ओळखले जातात. मे महिना आता संपण्याच्या मार्गावर आहे. पाऊसही अधूनमधून आपला अवतार दाखवत असताना काल बुधवारच्या साप्ताहिक बाजारासाठी डिचोलीत लोकांची मोठी गर्दी पावसाळी बेगमीसाठी बरीच गर्दी उसळली होती.
पाऊस संपल्यानंतर तसेच वायंगण शेत पिकावेळी घेतल्या जाणाऱया विविध गोष्टींच्या पिकांना या बाजारात बरीच मागणी असते. वसंत ऋतूत बहणारा निसर्ग आणि या निसर्गात मिळणारी विविध फळे व इतर गोष्टी यासाठी गोवेकर दरवषी प्रतिक्षेत असतात. याही वषी लोकांनी या गोष्टींच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. बेगमीच्या गोष्टींमध्ये केंद्रबिंदू असते ती गोव्याच्या मातीतील लाल सुकी मिरची. यावषी मात्र हवामान बदलामुळे सर्वच पिकांवर आलेली संक्रांत आणि परिणाम या गोष्टींच्या वाढलेल्या दरांवरून दिसून येत आहे. मिरचीचे दर तर सध्या गगनाला भिडलेले दिसून येत आहे.
मयेची गावठी मिरची यावेळी “खिशासाठी तिखटच”
गावठी मिरचीचे दर सध्या हजार रूपये प्रति किलो प्रमाणे आहेत. त्यातच मये गावची गावठी सुकी लाल मारची मिरची सर्वत्र प्रसिध्द. मयेतील मिरचीचे दर तर काल बुधवारी 1 हजार रू. प्रति किलो प्रमाणे होते. काही विपेते हि मिरची 900 रू. प्रति किलो या दराने द्यायला तयार होत होते. या दरांमध्ये वाणपण करूनही बदल होत नव्हता. यापूर्वी हि मिरची सुमारे अकराशे, बाराशे रूपये किलो प्रमाणे मयेतच विक्रिला होती. व तोच दर बाजारातही चालत होता. परंतु आत सदर दरांमध्ये किंचितसा घट झाला आहे. तरीही हि मिरची सामान्य माणसाच्या खिशासाठी तिखटच आहे. त्यामुळे लोक बाजारात उपलब्ध असलेल्या मांदे, मयडे, दोडामार्ग या भागातील मिरचीकडे आपला मोर्चा वळविताना दिसत होते.
इतर मिरचीचे दर परवडणारे आणि न परवडणारेही
मे महिन्यात गोवा राज्यात सर्वात जास्त सुक्मया लाल मिरचीचा खप असतो. त्यामुळे राज्य त मोठय़ा प्रमाणात बाहेरील राज्यांमधून लाल सुकी मिरची दाखल होत असते. त्यातच गोव्यातील इतरही भागातील मिरची विपेते आपापल्या गावातील मिरची घेऊन दर आठवडा बाजारात फिरत असतात. डिचोली बाजारात काल बुधवारी मयेच्या लाल सुकी मिरचीबरोबरच इतर भागातीलही मारची उपलब्ध झाली होती. त्यात मांदे व दोडामार्ग भागातील लाल मिरचीचा भाव 900 रू. प्रति किलो प्रमाणे होता. या मिरचीसाठी वाणपण केल्यास ती 850 ते 800 रूपयांपर्यंत दिली जात होती. मयडे भागातील मिरचीचा दर प्राथमिक 800 ते 850 रू. प्रति किलो प्रमाणे होता. त्यात पन्नास ते शंभर रूपये कमी होत होते. तर काणकोण, जांबोटी भागातील मिरची 400 रू. प्रति किलो प्रमाणे विकली जात होती. खानापूर येथील मिरचीचा भाव 250 रू. प्रति किलो होता. मोठय़ा प्रमाणात मिरची खरेदीवर काही प्रमाणात सुटही मिळत होती.
गावठी मिरचीच्या नावावर फसवणूक
गोव्यात गावठी लाल मिरचीला या दिवसांमध्ये बरीच मागणी असते, हि बाब पुरेपूर माहित असलेल्या काही स्थानिक तसेच परप्रांतीय मिरची विपेत्यांकडून व्यवहारात गोवेकरांची मोठी फसवणूक होत असते. यावषी तर गावठी मिरचीच्या दरांनी उच्चा?क गाठल्याने गोव्याबाहेरील मिरची गोव्यात आणून त्यांना गोव्यातील विविध गावांची नावे देऊन चांगला दर लावून खपवली जाते. तसेच काहीजण तर थोडी गोव्यातील मिरची विकत घेऊन त्यात बाहेरील मिरची मिश्र करतात आणि ती गोव्यातील मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावांची नावे लावून खपवली जात आहे. या प्रकारच्या अनेक तक्रारी सध्या लोकांकडून केल्या जात आहेत. काही स्थानिक विपेतेही या फसवणुकीच्या व्यवहारात गुंतल्याचे दिसून येत आहे. अशा विपेत्यांविरोधात कोणीही कडक पावले उचलत नसल्याने त्यांचे बरेच फावत आहे.
आमसुले, हळसांदे, चवळी, फजाव, आगळची मोठी खरेदी
या मोसमात जंगलात तसेच शेतात उगवणाऱया वस्तु?ना लोकांची बरीच मागणी असते. जंगलात लागणाऱया कोकमची आमसूल तसेच आंब्याची आमसूलेही बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होती. कोकमच्या आमसुलांची किंमत 200 रू. पड प्रमाणे तर आंब्याच्या आमसुलांचा दर 150 रू. पड असा होता. फजाव रू. 200 पड, हळसांदे रू. 150 पड, तर चवळी रू. 100 पड असे होते. चिंचेची आमटाण रू. 200 प्रति किलो प्रमाणे विकली जात होती. तर आगळ अर्धा लीटर बाटली रू. 100 प्रमाणे होती. सुकी कोथिंबीर रू. 200 प्रति किलो प्रमाणे विकली जात होती. या सर्व गोष्टी खरेदीसाठी बाजारात बरीच झुंबड होती.
सुक्या मासळीला मत्स्यप्रेमींकडून गराडा
गोव्यात 1 जून पासून दोन महिने कायद्याने मासेमारीला बंदी असल्याने तसेच पाऊस, वारे, वादळी हवामानामुळे या काळात राज्यात ताजी मासळी मिळणे कठीण होते. त्यामुळे बाजारात ज्यादिवशी ताजी मासळी मिळत नाही, त्यावेळी सुक्मया मासळीवर गुजणार करण्याची पाळी मत्स्यप्रेमींवर येते. कारण गोवा राज्यात मत्स्य खवय्येच भरपूर आहेत. या लोकांसाठी ताजी मासळी नसताना सुकी मासळीच वरदान असते. त्यासाठी या महिन्यात पुढील तीन ते चार महिन्यांसाठी सुक्मया मासळीचा साठा करून ठेवण्यासाठी लोकांची पावले सुक्मया मासळी विपेत्यांकडे वळत असतात. डिचोली बाजारातही काल सुकी मासळी विपेत्यांना मत्स्यप्रेमींनी गराडाच घातलेला दिसून येत होता.
बाजारातील विपेत्यांकडे सुके मोठे बांगडे रू. 200 ला पाच, मध्यम बांगडे रू. 100 ला दहा, तर बारीक बांगडे रू. 100 ला 15 होते. सुकी कोळंबी रू. 150 पड तर रू. 600 पायली होती. भोक्शी रू. 100 ला पड, गालमो रू. 100 ला पड असे दर होते. त्याचबरोबर इतरही विविध सुकी मासळी वर खाली दराने उपलब्ध होती. गोवेकरांना वरील सुकी मासळी सर्वात प्रिय असल्याने वरील सर्व नगांसाठी लोकांकडून नियमित खरेदी चालूच होती.
या सर्व बेगमीच्या वस्तु?बरोबरच पावसात घरांसाठी लागणारी ताडपत्री, प्लास्टिक अच्छादने उपलब्ध होती. तसेच पहिल्याच पावसात घरांच्या परसात तसेच गार्डनमध्ये रोवण्यात येणाऱया काही ठळ, भाजी रोपांची बियाणे बाजारात उपलब्ध झाली होती. त्यांचीही खरेदी होत होती. जंगली रानमेवाही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होता.