अन्यथा रस्त्यावर उतरू; कोरगाव भटवाडी येथील पालकांचा इशारा
प्रतिनिधी /पेडणे
केंद्र सरकारच्या सहकार्यातून राज्य सरकार सर्व सरकारी प्राथमिक शाळांना एक परिपत्रक काढून ज्या शाळेमध्ये आवश्यकते पेक्षा कमी पट संख्या आहे त्या शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. हा प्रस्ताव भटवाडी कोरगाव येथील सरकारी शाळा पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत सादर करण्यात आल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱया शाळेत विलीनीकरण करू नये अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा पालकांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिला.
एकेकाळी शाळा बंद पडत असताना दोन विद्यार्थी घेऊन आम्ही गावागावात वाडय़ावर वाडय़ावर लोकांच्या दारापर्यंत जाऊन शाळेत मुले आणली आणि ती शाळा वाचवली. आम्हाला बालरथ नसतानासुद्धा मुले शाळेत पाठवली आता ती शाळा आम्ही कोणत्याच प्रकारे बंद पडू देणार नाही किंवा विलीनीकरण करू देणार नाही. सरकार समोर दोन हात करायला मागेपुढे पाहणार नाही. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा पालकांनी दिला आहे.
सरकारने फेरविचार करून या शाळेचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी मदत करावी. अन्यथा आम्हाला रस्त्यावर येऊन आमची शाळा वाचवावी लागणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही शाळा विलीनीकरण करण्यास देणार नाही. ज्या शाळेसाठी आम्ही एका काळी मुले नसतानाही घरोघरी जाऊन मुले या शाळेत घालावी.यासाठी प्रयत्न केले आणि ही शाळा वाचवली आहे. या शाळेमधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत. ते उच्च पदावर पोहोचले आहेत. याची जाणीव सरकारने ठेवावी आणि आम्हाला रस्त्यावर उतरण्यापासून वाचवावे, असे आवाहन पालक विनिता मांजरेकर यांनी केले.
बहुजन समाज सुशिक्षित व्हावा आणि त्यांच्या मुलांना घरापर्यंत शिक्षण मिळावे यासाठी पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावागावात शाळा सुरू केल्या. आणि आता या शाळा सरकार बंद करू पाहत आहे. त्यापेक्षा सरकारने ज्या काही मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत. त्या शाळा पूर्ववत चालू करण्यासाठी प्रयत्न करावते. त्यांना चांगल्या सुविधा द्याव्यात. सरकारच्या शाळा विलीनीकरण निर्णयाला आमचा विरोध असल्याचे ज्ये÷ नागरिक भिवा गावडे यांनी सांqिगतले.
यावेळी प्रियांका नर्से, सोनाली गावडे, अपर्णा गावडे या पालकांनी शाळा विलीनीकरण्याच्या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. आम्ही आमच्या मुलांना ज्या वेळी बालरथ सुविधा नसतानाही शाळेपर्यंत पोचवले. त्यांना शिकवलं आणि आम्हीही त्याच शाळेत शिकलो. ही शाळा आता कुठल्याही परिस्थितीत बंद करू देणार नाही असे सांqिगतले.
मराठी शाळेत संस्कारः आरती थळी
मराठी शाळेतून होणारे संस्कार भविष्यात उच्चपदावर पोचण्यास आणि समाजात कशा पद्धतीने माणसाने वागावे याची शिकवण मिळते. म्हणून ही शाळा वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावे लागले तरी आम्ही कुणाची पर्वा करणार नाही. परंतु आम्ही आमची शाळा वाचणारच असा निर्धार आरती थळी यांनी केला.