अफगाणिस्तानातून अमेरिकेने आपले सारे सैन्य मागे घेतलेल्या घटनेस आणखी दोन महिन्यांनी एक वर्ष पूर्ण होईल. याचाच अर्थ गेल्या नऊ-दहा महिन्यांच्या कालावधीत अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट सुरू आहे. आपल्या नेहमीच्या धोरणानुसार सोशल मीडियावर निर्बंध, धार्मिक शिक्षणाची सक्ती, महिलांवर कठोर प्रकारचे प्रतिबंध या मार्गाने तालिबानी राजवटीचा प्रवास सुरू आहे. हा प्रवास पाहता अफगाणिस्तान तेथील अमेरिकेच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सत्ताधाऱयांच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीनंतर पुन्हा गणतीनुसार 20 वर्षे मागे आणि कालमापनानुसार कित्येक शतके मागे फेकण्याचे काम तालिबानी राजवट इमानेइतबारे करीत आहे, हे स्पष्ट आहे. यामुळे गेल्या वीस वर्षात वाढीस लागलेल्या एका पिढीच्या विकासाची किंमत, साक्षरतेत, आधुनिकतेत वाढ होण्याची स्थिती, महिला-मुलींचे अधिकार आणि जीवनमान या साऱयाच गोष्टी तेथे एखादी भीषण जादू घडावी अशा अदृश्य झाल्या आहेत. अमेरिका आणि तिचे पाश्चात्य मित्रदेश यांची अपेक्षा खरे तर अफगाणिस्तानात बहुपक्षीय लोकशाही आणण्याची होती. नवी राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, महिला आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षा यांची अंमलबजावणी करण्याचा त्यांचा हेतू होता. परंतु, हे सारे साध्य करण्यासाठी प्रथमतः राष्ट्रबांधणीची गरज असते. हे काम मात्र झाले नाही. खरे तर अगणित अफगाण नागरिकांना शांततापूर्ण वातावरण, लोकशाही हवीच होती. तथापि, वीस वर्षांच्या कालावधीत अमेरिकेचे लष्करी व शस्त्रबळ, पैसा, दरम्यानच्या काळात बदललेले चार राष्ट्राध्यक्ष अफगाणिस्तान हे एकात्म आणि लोकशाही राष्ट्र बनवण्यात साफ अपयशी ठरले. निवडलेल्या करझाई, घानी यांच्यासारख्या स्थानिक अफगाण नेतृत्वाने आपली अकार्यक्षमता सिद्ध करीत या अपयशास अधिकच हातभार लावला.
अलीकडच्या काळात शोधक पत्रकारांचा समूह, प्रकाशक आणि इतर साहाय्यक मिळून आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण घटनांमागची कारणे शोधून त्याचा सविस्तर अहवाल प्रकाशित करतात. या अहवालास ‘वॉचडॉग रिपोर्ट’ या नावाने संबोधले जाते. अशाप्रकारच्या निःपक्षपाती आणि वस्तुनि÷ शोधक पत्रकारितेने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभास अधिक बलवत्तर करण्याची कामगिरी अनेकवेळा बजावली आहे. गेल्या बुधवारी अफगाणिस्तानमधील परिस्थितीची कारणमिमांसा करणारा एक ‘वॉचडॉग रिपोर्ट’ प्रसिद्ध झाला. ज्याने जागतिक स्तरावरील समाजमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले. अनेक वृत्तपत्रांनी या अहवालास ठळक प्रसिद्धी दिली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीच्या निरीक्षकांना, जागतिक पातळीवरील मुत्सद्दी, राजकारणी आणि अभ्यासकांना एक ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणून उपयुक्त ठरणारा आहे.
सदर अहवालात म्हटले आहे, की अमेरिकेने अफगाणी लष्करासमोर अशी उद्दिष्टे ठेवली जी साध्य करणे त्या लष्करास कधीच शक्मय होणार नव्हते. जी पावले अमेरिकेने उचलली त्यातून तात्कालिक यश मिळाले. पण त्यामुळे खऱया समस्या सुटण्यास अधिकच अडचण निर्माण झाली. सुविधा-संसाधनांचा जो मारा केला, तो नियोजन शून्यतेमुळे कामी आला नाही. 20 वर्षांच्या प्रशिक्षणानंतरही ‘अफगाण राष्ट्रीय बचाव आणि सुरक्षा दल’ एकी आणि उत्तम कामगिरी केवळ स्वतःच्या जीवावर करेल इतपत सक्षम बनले नाही. याचा दोषही अमेरिका आणि अफगाणी सरकारकडे जातो. या दोन्ही पक्षांपैकी समोर उभ्या ठाकलेल्या तालिबानी, अल कायदा आणि इतर आव्हानांचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारची राजकीय व प्रशासकीय बांधिलकी आवश्यक असते तिचाच पूर्णतः अभाव होता. परिणामी, अफगाणी सुरक्षा दलाचे अमेरिकेवरील संपूर्ण अवलंबित्व, भ्रष्टाचार, सुरक्षा दलातील सेवा सोडून तालिबान्यांशी संगनमत करणे हे दोष निर्माण झाले. सर्व अफगाणी जनतेस सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हल्लेखोरांना निष्प्रभ करण्यासाठी जितक्मया हवाई हल्ल्यांची गरज होती, ते करण्यात आले नाहीत. हवाई हल्ल्यांची संख्या सतत कमी-जास्त होत होती. उदा. 2019 साली एकूण 7,400 हवाई हल्ले करण्यात आले तर दुसऱयाच वषी त्यांची संख्या केवळ 1,600 वर आली. यामुळे जमिनीवर तालिबान्यांशी लढणाऱया अफगाणी सैनिकांना त्यांना दूर ठेवण्याइतका पाठिंबा मिळाला नाही. भरीस भर म्हणून फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रम्प प्रशासनाने तालिबान्यांबरोबर दोहा करार केला. यामुळे हवाई हल्ल्यात आणखी घट तर झालीच शिवाय अफगाणी सैनिकांचे आधीच गुळमुळीत नितीधैर्य अधिकच खचले.
या वीस वर्षांच्या काळात करझाईंच्या नंतर सत्तेवर आलेले घानी यांना आपल्याच लष्कराच्या स्थितीबद्दल फारशी माहिती नव्हती. अमेरिकेवरील अविश्वास आणि पाश्चात्य देश आपल्याला पदच्युत करण्यास टपलेले आहेत, या भीतीने पछाडलेल्या घानी यांनी अंतर्गत वर्तुळ आपल्याबरोबर घेण्यासाठी अनेक अमेरिका प्रशिक्षित लष्करी अधिकाऱयांना काढून टाकून आपल्या नि÷ावंतांची तेथे नेमणूक केली. काबूलचा पाडाव जवळ येईपर्यंत अशाप्रकारे अनेक फेरबदल करून लष्करात अनिश्चिततेचे वातावरण तयार करण्यास घानी यांनी हातभार लावला. लष्करातील अशा प्रकारच्या तडकाफडकी नेतृत्वबदलामुळे नव्या व तुलनेत अननुभवी नेतृत्वाचा सामना करण्यासाठी तालिबान्यांना आयतीच सुपीक भूमी उपलब्ध झाली. या वॉच डॉग अहवालाचे प्रमुख ही व इतर कारणे नमूद करून लिहितात, ‘काबूलचे रक्षण करण्यासाठी लष्करातील आणि हवाई दलातील काही अधिकारी सज्ज होते. पण त्यांना नैतिक पाठिंबा देऊन मनोधैर्य वाढविण्याऐवजी अध्यक्ष घानी स्वतःच देश सोडून पळाले. त्यांच्या पलायनानंतर ज्यांना विमान उडवता येते ते सारेच इतर इच्छुकांना घेऊन त्यांच्या मागोमाग शेजारील देशात आश्रयास गेले. या बेजबाबदारपणामुळे अमेरिकन बनावटीची अनेक वाहने, शस्त्रास्त्रs आणि इतर युद्ध उपकरणे आयतीच तालिबान्यांच्या हाती लागली. अध्यक्ष घानी यांनी पलायनाचा मार्ग स्वीकारला नसता तर काबूलचा पाडाव तसा शक्मय झाला नसता.’हा अहवाल म्हणजे अमेरिका आणि सहकारी देशांचा, अफगाणिस्तानातील कमकुवत राजवटीचा, नागरिकांच्या दारुण अपेक्षाभंगाचा जिवंत आलेखच. ‘दहशतवाद, अतिरेकी शक्तींशी युद्ध कसे लढू नये’ याचा धडा याद्वारे इतर अनेकांना मिळत राहील. तालिबान्यांनी अमेरिका, पाश्चात्य मित्रदेश, अफगाणी लोकशाहीवादी सरकार या साऱयांनाच नमवले, हा संदेश या अपयशामुळे सर्वत्र पोहोचला आहे. जगातील दहशतवादी संघटनांचे मनोबल वाढून त्यांच्या हिंसक कारवायात वाढ झाली तर त्याचे परिणाम साऱया जगास भोगावे लागतील.
– अनिल आजगावकर