प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयात हिंदी विभागाच्यावतीने बुधवारी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, प्रा. विजयकुमार पाटील उपस्थित होते.
प्रा. विजयकुमार पाटील यांनी हिंदीविषयी माहिती देत आज हिंदी ही रोजगार व व्यवसायाची भाषा बनली असल्याचे सांगितले. ज्ये÷ साहित्यिकांमुळे हिंदी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी प्रेमचंद, हरिवंशराय बच्चन अशा ज्येष्ठ साहित्यिकांमुळे हिंदी साहित्य समृद्ध झाल्याचे सांगितले. प्रारंभी सरिता शर्मा, सरिता खापरे, समिता मोदगेकर यांनी प्रार्थना सादर केली. अपर्णा अकणोजी हिने स्वागत केले. विद्या धोंगडीने आभार मानले.
कॉमर्स विभागातर्फे हिंदी दिन
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्यावतीने हिंदी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या प्राचार्या अनुजा नाईक होत्या.
विभाग प्रमुख प्रा. एस. एस. शिंदे यांनी प्राध्यापक, विद्यार्थीवर्ग, प्रमुख पाहुणे यांचे स्वागत केले. तसेच भाषेच्या समृद्धीमुळे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक समृद्धी होते. भाषा ही मानव जीवनाची व समाजाची वृद्धी करते, असे सांगितले. प्राचार्या अनुजा नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अजित कोळी यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व, हिंदी भाषेची देशात आणि विदेशात वाढती प्रगती, वेगवेगळय़ा क्षेत्रात हिंदी भाषेच्या संधी इत्यादीची माहिती दिली. विद्यार्थिनी कुमारी शिंदे हिने आभार मानले.