बसथांब्याचे छत कोसळण्याच्या स्थितीत : बसथांब्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का?
बेळगाव : सध्या मोदींच्या रोड शोकरिता कॉलेज रोडवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र या मार्गाशेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या बसथांब्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रोड शो दरम्यान कोणी नागरिक बसथांब्यावर चढल्यास अनर्थ घडण्याची शक्मयता आहे. धोकादायक बसथांब्याकडे मनपा प्रशासन लक्ष देईल का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करून प्रवाशांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. मात्र याकामी महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटी कंपनी अपयशी ठरली आहे. शहरात विविध ठिकाणी स्मार्ट बसथांब्यांची उभारणी करण्यासाठी कोटींचा खर्च करण्यात आला आहे. बसथांब्याशेजारीच जुने बसथांबे जैसे थे ठेवण्यात आले आहेत. मात्र सदर बसथांबे मोडकळीस आले असून प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरात विविध ठिकाणी असे बसथांबे आहेत, पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. राणी चˆम्मा चौक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेला बसथांबा जीर्ण झाला आहे. तसेच कॉलेज रोडवर धर्मवीर संभाजी महाराज उद्यानाजवळ असलेल्या बसथांब्याच्या छताचे पत्रे कोसळत आहेत. हा बसथांबा पत्र्याचा बनविण्यात आला होता. पण हे पत्रे पूर्णपणे गंजले असून, कोसळत चालले आहेत. प्रवाशांच्या अंगावर कोसळण्याचा धोका आहे. वास्तविक पाहता बसथांब्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पण बसथांब्यांच्या दुरुस्तीकडे मनपा अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. जीर्ण झालेले बसथांबे हटवून नवीन बसथांबे उभारण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. मात्र याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नाही. मात्र सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावात येत असून कॉलेज रोडमार्गे रोड शो होणार आहे. याकरिता कॉलेज रोडवर दुतर्फा बॅरिवेड्स लावण्यात आले आहेत. रोड शोवेळी गर्दी होण्याची शक्मयता असून यावेळी कोणीही बसथांब्यावर चढल्यास छताचे पत्रे कोसळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे लक्ष देईल का? मुद्दा उपस्थित झाला आहे.