आचरा/ प्रतिनिधी-
गेले काही दिवस सुटलेला वादळी वारा व सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका आचरा हिर्लेवाडी येथील निशिकांत पांडुरंग तोंडवळकर यांच्या राहत्या घराला बसला. त्यांच्या घराच्या दोन मातीच्या भिंती व छप्पर कोसळल्याने छप्पराचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे 3.30 वाजता घडली. यामुळे घराचे 20 हजाराचे नुकसान झाले.
तोंडवळकर यांच्या घराच्या भिंती कोसळून छप्परचा काही भाग कोसळला .तेव्हा, घरातील माणसे घराच्या पुढच्या भागात झोपलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. भिंती व छप्पर कोसळल्याने घराचे वासे, कौले, रिपा, पत्रे असे मिळून सुमारे 20 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर आचरा तलाठी अनिल काळे , पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची पंचायादी घालून माहिती महसूल विभागाला कळविली.