कोपर्डे, सातोडे, भिरोंडा, दाबे, कंरझोळ मिळून 43 रुग्ण
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दहा दिवसांपूर्वी ही संख्या 30 होती ती आता 43 वर पोहोचलेली आहे. कोपर्डे, सातोडे, भिरोंडा, दाबे, करंझोळ या पाच गावांमध्ये हे संक्रमण आढळून आले असून यामुळे तमाम नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आरोग्य खात्याचे यंत्रणेतून करण्यात आलेली आहे.
आरोग्य यंत्रणेकडून वेगवेगळय़ा ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी सुरू केली असून कोणत्याही ठिकाणी पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष दखल घेण्यात यावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.
कोपर्डे, सातोडे व भिरोंडा या ठिकाणी एकूण 30 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा सक्रिय झाली होती. पैकी कोपर्डे व सातोडे या गावांमध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घराघरात जाऊन या संदर्भात जनजागृती करण्यावर त्यांनी भर दिला होता. एका बाजूने आरोग्य खात्यातर्फे उपयोजना व जनजागृती सुरू असताना दुसऱया मार्गाने मात्र डेंग्य?च्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. प्राप्त माहितीनुसार दाबे, कंरझोळ आदी दोन नवीन गावांची भर पडलेली आहे.
करंझोळ व दाबे या दोन गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलेला आहे. यामुळे आरोग्य खात्याची यंत्रणा सक्रिय झालेली आहे?. उपाययोजना हाती घेण्यात आली असून प्रत्येक घरापर्यंत जनजागृती पत्रके वाटणे यावर भर देण्यात आलेली आहे.
आरोग्य खात्यातर्फे घरा सभोवताली किंवा आपल्या भागांमध्ये पाण्याचा साठा होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी अशा प्रकारचे आवाहन वारंवारपणे करण्यात येत आहे. दरम्यान पावसाळा अजूनपर्यंत सुरु झालेला नाही?. पावसाळय़ामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे आरोग्य खात्याचे यंत्रणेनी ही बाब गांभीर्याने घ्यावी व उपायोजना त्याचबरोबर डेंगूची संक्रमण आणखीन वाढणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे.