ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भीमा पाटस सहकारी साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचार प्रकरणात भाजप आ. राहुल कुल यांना राज्य सरकारने क्लीन चिट दिली आहे. साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांनी याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नाही. मात्र, 2021-22 लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे.
दरम्यान, इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून, अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.