प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळात आम्ही नर्स म्हणून काम केले. त्यावेळी कोणीही काम करण्यास तयार नव्हते. जीवावर उदार होऊन आम्ही काम केले आहे. मात्र आता आम्हाला वगळून नवीन परिचारिकांना व कर्मचाऱयांना एनआरएचएममध्ये सामावून घेतले जात आहे. यामुळे आमच्यावर अन्याय होत असून आम्हालाच कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी कोरोना काळात काम केलेल्या परिचारिका आणि कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिह्यामध्ये जवळपास 120 हून अधिक जणांनी कोरोना काळात काम केले आहे. त्याकाळी अनेकांनी काम थांबविले. मात्र जीवाची पर्वा न करता आम्ही सेवा बजावली. याचा विचार करून आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. बागलकोट जिह्यात कोरोना काळात काम केलेल्यांना कामावर घेतले आहे. तसे आम्हालाही कामावर घ्या, अशी मागणी केली. यावेळी बसाप्पा तिगडी, एस. जी. श्वेता, गुलाब तांबट, बसवराज सलगर, सतीश बेळवंकी, सविता चौगुला व कर्मचारी उपस्थित होते.