किरगिझ प्रजासत्ताकच्या संघावर 2-0ने मात
वृत्तसंस्था/ इंफाळ
भारतीय फुटबॉल संघाने तीन राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकण्यात यश मिळविले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या 30 हजार प्रेक्षकांनी सुनील छेत्री आणि त्याच्या चमूचे टाळ्या वाजवून मनापासून कौतुक केले. उच्च मानांकित किरगिझ प्रजासत्ताकच्या संघाविरुद्ध प्रभावी फुटबॉल खेळून त्यांनी 2-0 असा विजय मिळवला आणि चषक पटकावला. एकही गोल आणि पराभव न स्वीकारता त्यांनी ही कामगिरी केली.
22 ते 28 मार्चदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दोन्ही सामने जिंकताना प्रभावी कामगिरी केली. त्यांनी म्यानमारवर 1-0 ने विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची सुऊवात केली आणि मंगळवारी किरगिझ प्रजासत्ताकविऊद्धच्या सामन्यांत दोन गोलांच्या फरकाने विजय मिळविला. दोन सामन्यांतून सहा गुणांसह ते आघाडीवर पोहोचले.
किरगिझ प्रजासत्ताकाविऊद्ध सुऊवातीचा गोल मध्यफळीतील संदेश झिंगानने नोंदवताना 34 व्या मिनिटाला लक्ष्य भेदले. ब्रॅंडन फर्नांडिसने हाणलेल्या फ्री-किकवर झिंगानने वेगाने झेपावत किरगिझ प्रजासत्ताकचा गोलरक्षक तोकोताएव एरझानला चकविले. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमेक यांनी चषक पटकावण्यासाठी सामना अनिर्णित ठेवणे पुरेसे आहे हे माहीत असूनही पूर्णपणे आक्रमण करण्यावर भर देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार भारताने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आक्रमणाची मालिका लावली.
84 व्या मिनिटाला अशाच एका आक्रमणात किरगिझ प्रजासत्ताकचा बचाव दडपणाखाली कोसळला. यावेळी नौरेम महेश सिंगला पेनल्टी बॉक्समध्ये डेव्हिडोव्ह निकोलाईने पाडल्यानंतर मिळालेली स्पॉट किक भारतीय प्रेक्षकांसाठी दुहेरी आनंदाचा विषय ठरली. भारतासाठी हा केवळ दुसरा गोलच ठरला नाही, तर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीसाठी त्याच्या कारकिर्दीतील 85 वा आंतरराष्ट्रीय गोल देखील राहिला.