प्रलय क्षेपणस्त्राच्या दोन नव्या युनिट्स होणार तयार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तरेकडील सीमांवर वाढत असलेल्या आव्हानादरम्यान भारतीय सैन्याने प्रलय क्षेपणास्त्रांच्या दोन युनिट्स तैनात करण्याचा विचार चालविला आहे. या युनिट्ससाठी क्षेपणास्त्र खरेदीकरता 7500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दोन्ही युनिट्समध्ये एकूण 250 क्षेपणास्त्रs तैनात असणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये वायुदलाच्या अंतर्गत प्रलय क्षेपणास्त्रांचे एक युनिट निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.
प्रलय क्षेपणास्त्रांच्या दोन युनिट्स स्थापन करण्याचे पाऊल देशाचे रॉकेट फोर्स निर्माण करण्याच्या दिशेने घेतलेला निर्णय आहे. हे रॉकेट फोर्स तिन्ही दलांच्या क्षेपणास्त्रांची देखभाल करेल आणि हल्ल्यांना मूर्त रुप देणार आहे. सैन्यासाठी क्षेपणास्त्रांचे दोन युनिट्स स्थापन करण्याचा विचार सध्या प्रारंभिक टप्प्यात असून लवकरच यावर ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंबंधी संरक्षण मंत्रालय औपचारिक घोषणा करणार आहे.
500 किमीपर्यंतच मारक पल्ला
स्वदेशात विकसित प्रलय क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटरपर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र रडारला चकवा देण्यास सक्षम आहे. याचमुळे या क्षेपणास्त्राला हवेत नष्ट करणे जवळपास अशक्य आहे. याचबरोबर हे क्षेपणास्त्र हवेत स्वतःचा मार्ग बदलण्यास सक्षम असून स्वतःच्या लक्ष्याचा शोध घेत त्याला नष्ट करू शकते. याचमुळे स्थानांतर करत असलेल्या लक्ष्यालाही नष्ट करण्याची यात क्षमता आहे. या क्षेपणास्त्राला डीआरडीओने विकसित केले आहे. प्रलय क्षेपणास्त्राच्या प्रकल्पावर 2015 मध्ये कार्य सुरू होते. डिसेंबर 2022 मध्ये याचे यशस्वी परीक्षण करण्यात आल्यावर त्याचा सैन्याच्या ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.