पुरुष एकेरीत प्रणॉयला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, सिंधू यापूर्वीच बाहेर
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या मलेशियन मास्टर्स सुपर-500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. शनिवारी पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला उपांत्यफेरीत हार पत्करावी लागली. तत्पूर्वी महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत तेई यांगकडून संपुष्टात आले होते.
शनिवारी या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या लाँग अँगसने भारताच्या एचएस प्रणॉयचा 17-21, 21-9, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा उपांत्य सामना 65 मिनिटे चालला होता. यापूर्वी प्रणॉय आणि लाँग अँगस यांच्यात आठवेळा सामने झाले असून दोघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत. या सामन्यात प्रणॉयने पहिला गेम 21-17 असा जिंकल्यानंतर अँगसने आपल्या वेगवान स्मॅश फटक्मयांवर पुढील दोन गेम्स जिंकून प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आणले. या लढतीत शेवटच्या दोन गेम्समध्ये प्रणॉयकडून परतीचे फटके व्यवस्थित नसल्याने त्याला हार पत्करावी लागली.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तेई यांगने पीव्ही सिंधूचा 21-13, 12-21, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात यांगने पहिला गेम 21-13 असा केवळ 14 मिनिटात जिंकल्यानंतर सिंधूने दुसऱया गेममध्ये आपल्या स्मॅश फटक्मयांवर नियंत्रण ठेवत हा गेम 21-12 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱया आणि निर्णायक गेममध्ये यांगने सिंधूवर 21-12 अशी मात करत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.