खाद्यतेल विक्रमी किमतीवरुन 30, डाळीचे भाव 10 टक्क्यांनी स्वस्त होणार ः भाज्या स्वस्तची शक्यता
नवी दिल्ली
देशामध्ये महागाईपासून दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. यामध्ये किरकोळ महागाईचे आकडे जवळपास 40 टक्के हिस्सेदारी ठेवणाऱया कृषी क्षेत्रातील तृणधान्ये, तेलबिया यासारख्या वस्तू, मसाला अन्न पदार्थ, तेल आणि डाळींच्या किमती विक्रमी पातळीवरुन खाली येत त्यात 21 टक्के घट झाली आहे. आतापर्यंत विक्रमी टप्यावर असणाऱया किमतीत 56 टक्क्यांपेक्षा अधिकची घसरण झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये फक्त तांदळाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.
साधारणपणे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीसदृश्य स्थितीमध्ये मागील दोन महिन्यात वस्तुंच्या किमतीत वेगाने घट झाली आहे. याचवेळी केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया याच्या अंदाजानुसार, काहीशी घसरण वगळता व्यापार सुरु राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र याचा परिणाम हा किरकोळ महागाईवर राहणार असल्याचे म्हटले आहे. आणखी एका अहवालानुसार जस जसा मान्सून पुढे सरकत राहिल तसे देशातील धान्याच्या व वस्तूंच्या किमतीवर दबाव वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासह भाज्यांच्या किमती कमी होत त्या स्वस्त होणार असल्याचे नमूद केले आहे.
गव्हाचे भाव घटले
ओरिगो ई मंडईतील सहाय्यक जनरल मॅनेजर तरुण सत्संगी यांच्या माहितीनुसार निर्यात बंदीमुळे गव्हाचे भाव घसरले आहेत. परंतु मागील हंगामामध्ये कमीत कमी पीक घेतल्याने यामध्ये घरसण राहिली आहे. दुसऱया बाजूला इंडोनेशियाच्या पाम तेलाच्या निर्यातीवर लागू केलेली बंदी हटविल्यानंतर पुरवठा वाढल्याने खाण्याचे तेल व तेल बियाचे भाव दबावात आहेत. युक्रेनमधील सुर्यफूल तेलाचा पुरवठा वाढल्याने त्याचा परिणाम हा तेल बाजारावर झाल्याचे दिसले.
कृषी मालाच्या किमतीत नुकतीच झालेल्या घसरणीची प्रमुख कारणे
जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेमधील मंदी येण्याच्या सावटाचा परिणाम
जगभरात वाढलेल्या व्याजदरामुळे बाजारातील अतिरिक्त रक्कम काढून घेतली
मालवाहतूक स्वस्त झाली, 23 मेपासून मालवाहतूक निर्देशांक 36 टक्क्यांनी घसरला
मे महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सत्र सुरुच
मुसळधार पावसामुळे देशात पिकांच्या पेरण्या वाढल्या आहेत.
निर्यात आणि खाद्यपदार्थाची खुली आयात रोखण्याचे धोरण