प्रतिनिधी /बेळगाव
भटक्मया कुत्र्यांच्या उपद्रवामुळे शहर आणि उपनगरातील नागरिक हैराण झाले असून कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा मनपावर मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. शहर आणि उपनगरातील भटकी कुत्री नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास देत नाहीत. रात्रीच्यावेळी ये-जा करणाऱया नागरिकांवर हल्ला करीत आहेत. तसेच दुचाकीस्वारांच्या मागे लागून हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
शहरातील भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण नसबंदी करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे सांगून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. मात्र केवळ आश्वासने देवून कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कचराकुंडीमध्ये टाकण्यात येणारे पदार्थ खावून भटकी कुत्री खूपच बलिष्ट बनली आहेत. दिवसभर गायब असलेली ही भटकी कुत्री रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरत असतात. दुचाकी वाहनधारक आणि पादचारी ये-जा करीत असल्यास त्यांच्या अंगावर धावून जात आहेत.
कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी सातत्याने करूनही महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. मोठय़ा प्रमाणात घोळक्मयाने जाणारी कुत्री अचानकपणे हल्ला करीत आहेत. तसेच रस्त्याशेजारी खेळणाऱया लहान मुलांच्या अंगावर धावून जखमी केल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका बालिकेला जखमी केल्याची घटना घडली. शहर आणि उपनगरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. वडगाव, विष्णू गल्ली परिसरात 20 ते 25 कुत्र्यांचा घोळका फिरत असून रस्त्यांवरून रात्रीच्यावेळी जाणाऱया प्रत्येक वाहनांच्या मागे लागत आहेत. त्यामुळे शहर आणि उपनगरातील भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी होत आहे.