पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : जागतिक बौद्ध परिषदो आयोजन : 30 देशांच्या 180 प्रतिनिधींचा सहभाग
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्ली येथे आयोजित जागतिक बौद्ध शिखर परिषेदच्या उद्घाटनानंतर केलेले वक्तव्य चीनला झोंबणारे आहे. भारताने जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिले आहेत. जेथे बुद्धांची करुणा असते, तेथे संघर्ष नव्हे तर समन्वय असतो, अशांतता नव्हे तर शांतता असते असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत. गौतम बुद्धांच्या उपदेशांमुळे शतकांपासून असंख्य लोक प्रभावित झाले आहेत. गौतम बुद्ध यांच्याकडून प्रेरणा घेत भारत विश्वकल्याणासाठी नवा पुढाकार हाती घेत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. चीनने गिळपृंत केलेल्या तिबेटमधील बौद्धधर्मीय भारतात आश्रय घेऊन आहेत. अशा स्थितीत बौद्ध विचारवंतांची ही परिषद चीनला निश्चितच खूपत असणार आहे. बुद्ध-युद्ध असा उल्लेख करत पंतप्रधानांनी चीनला सुनावण्यासह रशिया-युक्रेन संकटावरही संदेश दिला आहे. य् ाgक्रेन-रशिया युद्ध, वर्तमान जागतिक आर्थिक स्थिती आणि हवामान बदलाशी निगडित चिंता या शतकातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मोदींनी म्हटले आहे. प्रत्येक देशाच्या प्राथमिकतेत स्वहितासह जागतिक हितही जोडलेले असावे ही काळाची गरज आहे. आज जग ज्या युद्ध आणि अशांततेने पीडित आहे, त्यावरील तोडगा गौतम बुद्धांच्या उपदेशांमध्ये असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
स्वतःभोवती गरीबीशी झगडणाऱया लोकांबद्दल अन् साधनसंपत्तीच्या अभावी संकटात सापडलेल्या देशांबद्दल सर्वांना विचार करावा लागणार आहे. एक उत्तम आणि स्थिर जगाच्या स्थापनेसाठी हाच एक मार्ग आहे. सद्यकाळ हा या शतकातील सर्वात आव्हानात्मक असल्याचे सर्वांनाच मान्य आहे. आज एकीकडे कित्येक महिन्यांपासून दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे जग आर्थिक अस्थिरतेतून जात आहे. दहशतवाद आणि धार्मिक उन्माद यासारखे धोके मानवतेच्या आत्म्यावर प्रहार करत आहेत. हवामान बदलासारखे आव्हान पूर्ण मानवतेच्या अस्तित्वावर संकट म्हणून घोंगावत आहे. हिमखंड वितळत असून पर्यावरणीय व्यवस्था नष्ट होत आहे. अनेक प्रजाती विलुप्त होत असताना आम्हा सर्वांदरम्यान बुद्धांवर श्रद्धा असणारे अन् प्रत्येकाच्या कल्याणात विश्वास ठेवणारे कोटय़वधी लोक देखील असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत. शांततेची आशा हीच पृथ्वीची सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा ही शक्ती एकजूट होईल तेव्हा बुद्ध यांचा बोध मानवतेचा विश्वास ठरेल. आधुनिक जगतातील प्रत्येक समस्येवर शेकडो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी दिलेल्या उपदेशांमध्ये उपाय दडलेला आहे. आज जग ज्या युद्ध आणि अशांततेने ग्रस्त आहे, त्यावरील उपाय बुद्धांनी शतकांपूर्वीच दिला होता असे विधान मोदींनी केले आहे. य् ाा दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन संस्कृती मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याद्वारे केले जात आहे. ही परिषद बौद्ध धर्मातील भारताचे महत्त्व अधोरेखित करणार आहे. या परिषदेत 30 देशांचे प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनांचे 150 प्रतिनिधी सामील झाले आहेत. या परिषदेत बौद्ध धर्मगुरु दलाई लामा देखील सहभागी होणार आहेत.