प्रतिनिधी /बेळगाव
बुक लव्हर्स क्लबच्या बैठकीत अनिता फडणीस यांनी अनुज धर व चंद्रचुड घोष यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिला. प्रारंभी अध्यक्ष चैतन्य हलगेकर यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना अनिता फडणीस म्हणाल्या, सुभाषचंद्र बोस यांचा नक्की विमान अपघातात मृत्यू झाला का? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. सत्य काय आहे हे आजही सांगता येत नाही. त्यातच नेताजींसारख्या दिसणाऱया गुमनामी बाबा किंवा भगवानजी, परदेवाला बाबा म्हणून वावरणाऱया व्यक्तीमुळे गूढ वाढते.
ऑगस्ट 1945 मध्ये नेताजींचा मृत्यू झाला. असे गृहीत धरले आहे. त्यानंतर चौकशी आयोगापुढे आलेले पुरावे, अपघातात जळून खाक झालेल्या विमानाचे भाग, त्यांच्या नातेवाईकांनी पाळलेली गुप्तता यातून गोंधळात भर पडत गेली. सरकारने सुद्धा त्याबाबत अनास्था दाखविली. नंतर काही माहिती उजेडात आली. पण ती सुद्धा अपुरी आहे. त्यामुळे आजही नेताजींच्या मृत्यूचे गूढ कायम आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी या लेखकांचे पुस्तक ग्रंथालयाला भेटीदाखल दिले.