डॉ. अनिल काकोडकर यांचे उद्गार : 57व्या अ. भा. मराठी विज्ञान परिषदेचे उद्घाटन
प्रतिनिधी /मडगाव
विज्ञान समाजाच्या, राष्ट्राच्या विकासाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्थानिक भाषांमधून विज्ञान तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
ते ‘आव्हान- जागतिक हवामान बदलाचे’ याविषयावर गोवा विद्यापीठात आयोजित केलेल्या 57व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्?घाटन सत्रात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आय.सी.टी. मुंबईचे कुलगुरू अनिरुद्ध जोशी, प्रो. ज्ये÷राज जोशी, कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन, कुलसचिव प्रो. विष्णू नाडकर्णी, उदय बाळ्ळीकर हे मान्यवर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, इ.स. 1700 साली भारताची जी.डी.पी. इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आकलन सर्व भाषांमधून होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमा दरम्यान स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हवामान बदलांकडे दुर्लक्ष नको
हवामान बदलांमुळे दुष्काळ, पाणीटंचाई, सुमद्राची वाढती पातळी व जैवविविधतेतील घट हे आपण गेली कित्येक वर्षे अनुभवतोय. या हवामान बदलांकडे आताच गांभीर्याने पाहिले नाही तर भावी पिढीला खूप त्रासदायक ठरू शकते. पर्यावरण बदल समजून घेऊन धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या प्रसंगी बोलताना म्हणाले.
मराठी विज्ञान परीषद गोवा विभाग गेली 25 वर्षे गोव्यात उल्लेखनिय कार्य करीत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.
इंडोनएशियात झालेल्या जी-20 परिषदेत देखील हवामान बदलावर खुप गांभीर्याने चर्चा झाली होती. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. या परिषदेनंतर गोव्यात होत असलेल्या विद्यान अधिवेशनात हा विषय निवडल्याबद्दल ही मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे कौतुक केले.