रत्नागिरी प्रतिनिधी
‘सामना’चा विचार सध्या महाराष्ट्रात कोण करत नाही. सामना उरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या शिवसेनेचे आहे. ते राष्ट्रावादीचे मुखपत्र नाही आणि सामनाचा विचार महाराष्ट्रात कोण करत नाही. जयंत पाटील त्यांची भूमिका स्वतः मांडतील, त्यांची वकीली सामनाने करण्याची आवश्यकता नाही. असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
VIDEO पहा >>> जयंत पाटीलांची वकीली ‘सामना’ने करण्याची आवश्यकता नाही
२५ रोजी मुख्यमंत्री एकनाथ महाराज यांची सभा रत्नागिरी शहरात प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे होणार आहे. त्यांच्या तयारी संदर्भात उद्योगमंत्री सामंत रत्नागिरीत आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अनिल देशमुखांना मिळालेल्या भाजपच्या ऑफर संदर्भात विचारले असता ते म्हणाले, “सध्या परिस्थिती अशी आहे कि वाईट झालं तर ते भाजप आणि शिंदे गटामुळे केलं आणि चांगले झालं तर ते महाविकास आघाडीमुळे झालं असं म्हटले जातं. सगळी चर्चा करण्यापेक्षा निवडणुक दिड वर्षावर आहे, त्यामुळे महाविकास आघाडी टिकू दे हिच माझी शुभेच्छा” अशी खोचक टिका उदय सामंत यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “निवडणुक आयोगाने पक्ष आणि चिन्हे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिलेली आहेत.त्यामुळे शिंदे आणि भाजप एकत्र सरकारमध्ये आहेत. त्यामुळे बाकीच्यांची या महायुतीमध्ये आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण निर्णय़ घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत” असेही सामंत पुढे म्हणाले.
महाविकास आघाडी जागा वाटपाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले ” महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. त्यातील पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य माझ्यासाठी महत्वाचे आहे. या आघाडीत कॉंग्रेस एक नंबर, दोन नंबरला राष्ट्रवादी आणि तीन नंबरला उद्धव ठाकरे गट आहे. त्यामुळेज जागा वाटपात हाच क्रम असावा असं पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. तर आघाडीत अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे. उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आमचे तेरा आमदार असून आम्ही मोठे भाऊ आहोत. त्यात आता लोकसभेची महाविकास आघाडीची यादी व्हायरल झालीय, त्यातील खासदार आमच्या संपर्कात आहे” असेही उद्योगमंत्र्यांनी म्हटले आहे.