Kai Prof. Essay writing competition organized by Uday Ramakant Khanolkar Vachan Mandir, Malgaon
स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला तालुका मर्यादीत
सावंतवाडी तालुक्यातील मौजे मळगांव येथील कै . प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव तर्फेदत्ताराम जी. सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार दिनांक १२ फेब्रु २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता वाचन मंदिराच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात होणार आहे.या स्पर्धेत सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ व वेंगुर्ला या चार तालुक्यातील सर्व प्रशालेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेसाठी या चारही तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना सर्व पालकांनी प्रोत्साहित करावे अशी विनंती करण्यात आली असून सहकार्याची अपेक्षा बाळगण्यात आहॆ या स्पर्धेच्या अधिक माहिती साठी कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर, मळगांव तालुका सावंतवाडी, मो. नं. ९४२२३७९३४६ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा गट १ इयत्ता ८ वी ते १० या गटात होणार आहे.एका प्रशालेतून फक्त चार स्पर्धक सहभाग घेऊ शकणार असून सहभागी स्पर्धकाने संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची सही शिक्का असलेले पत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. निबंध लेखनासाठी घडयाळी एक तास वेळ दिला जाणार आहे.निबंध लेखनासाठी शब्द मर्यादा ४०० ते ५०० इतकी असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक रुपये ५००/-, द्वितीय पारितोषिक रुपये ३००/- व तृतीय पारितोषिक रुपये २००/- तर उत्तेजनार्थ २ पारितोषिके प्रत्येकी १००/- याप्रमाणे रोख असणार आहेत.तसेच प्रशस्तीपत्र व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे .
निबंधाचे विषय पुढील प्रमाणे आहेत.या विषयांमध्ये ‘माझ्या कल्पनेतील अमृत महोत्सवी भारत”,”युवा शक्ती हीच खरी राष्ट्रशक्ती” व “होय, मी निसर्ग बोलतोय” या विषयांचा समावेश असणार आहे.दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत स्पर्धकांनी शाळेमार्फत ग्रंथालयाकडे नांवे नोंदवायची आहेत.अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९४२२३७९३४६, ९४२११४९३४४, ९८८१७१३९३८ हे आहेत.
न्हावेली / वार्ताहर