प्रत्येक श्लोकात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कालिदासाच्या अद्भूत प्रतिभेचा आपणाला प्रत्यय येत असतो. कित्येक गोष्टी आपल्याला नाविन्यपूर्ण वाटतात, तर काही अजिबात माहित नसतात. मग ते प्रदेश, पर्वत, नद्या, झाडे, वेली, पशुपक्षी इ. ते वाचून आपण अवाक् होतो. त्यावेळी ‘यासम हाच’ असे आपल्याला म्हणावेसे वाटते. आता पुढील श्लोक पाहू… ये संरम्भोत्पतनरभसाः स्वङ्गभङ्गाय
तस्मि-न्मुक्ताध्वानं सपदि शर्मा लङ्घयेयुर्भवन्तम्।
तान्कुर्वीथास्तुमुलकरकावृष्टीपातावकीर्णा- न्के वा न स्युः परिभवपदं निष्फलारम्भयत्नाः।।54।। अर्थः- त्या पर्वतावर, रागावल्यामुळे जोराने उडय़ा मारणारे जे शरभ नावाचे प्राणी आहेत, ते कदाचित् टप्याबाहेर असलेल्या तुझ्यावर आपले हातपाय मोडून घेण्यासाठी एकदम उडय़ा मारतील. त्यांना तू जोराचा गारांचा वर्षाव करून झोडपून काढ. निष्फळ होणाऱया गोष्टींसाठी प्रयत्न करून कोण बरे फजित पावणार नाही?
वरील श्लोकात यक्ष मेघाला माहिती देतोय की, हिमालय पर्वतावर शरभ नावाचे प्राणी मेघगर्जना ऐकून रागावतात आणि त्याच्यावर जणू हल्ला करण्यासाठी जोरात उडय़ा मारतात! हे त्या प्राण्यांचे स्वभाव वैशिष्टय़ असावे. जसे पाऊस जवळ आला की, बेडूक ओरडतात, काजवे चमकतात इत्यादी. तसे ह्या शरभ नावाच्या प्राण्यांना मेघगर्जनेचे आकर्षण वाटत असावे. त्या दिशेने ते धाव घेत असावेत. पण ‘शरभ’ म्हणजे नेमके कोण? तर मल्लिनाथाच्या म्हणण्यानुसार ते टोळ असावेत. तर कोणी म्हणतात ते हरिण असावे. पण शरभ हा अष्टपाद प्राणी म्हटले आहे. हरिणाला चारच पाय असतात. पण टोळ हा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो. कारण अतिवृष्टी किंवा गारांच्या माऱयामुळे टोळ मरून पडलेले दिसतात. तर एका ठिकाणी त्याच्या व्युत्पत्तीत ‘अष्टपादः शरभः सिंहघाती’ असे त्याचे वर्णन केले आहे. त्याचा अर्थ आठ पायांचा प्राणी सिंहांना मारणारा होता असे दिसते. पण तो कालिदासाच्या वेळी खरेच अस्तित्वात होता का? असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित डायनासोरसारखा एखादा प्राणी कधी तरी अस्तित्वात असेलही. पण इथे टोळ हा अर्थ पटणारा आहे. कारण इतक्मया उंचीवर असणाऱया मेघापर्यंत ते पोहचू शकत नाहीत
तत्र व्यक्तं दृषदि चरणन्यासमर्धेन्दुमौलैः
शस्वत्सीध्दैरुपचितबलिं भक्तिनम्रः परीयाः।
यस्मिनदृष्टे करणविगमादूर्ध्वमुध्दूतपापाः
संकलपन्ते स्थिरगणपदप्राप्तये श्रद्दधानाः।।55।।
अर्थः- त्या हिमालयावर एका शिळेवर उमटलेल्या, नेहमी योगिजनांनी पूजा केलेल्या शशिशेखर शंकराच्या पावलांच्या खुणांना भक्तिभावाने नम्र होऊन प्रदक्षिणा कर. त्यांचे दर्शन झाले की, भक्त सर्व पापांपासून मुक्त होतात आणि मृत्यूनंतर शिवगणांच्या शाश्वत पदाला पोहचतात.