महापूर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासक चव्हाण यांचा निर्णय : अधिकारी तीन दिवस घेणार तालुकानिहाय आढावा
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जिवीत व वित्त हानी टाळण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेतील 12 अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक अधिकाऱयाने पुढील चार दिवस एक तालुक्यातील आढावा घेऊन त्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार व प्रशासक संजयसिंह चव्हाण यांना द्यायची आहे.
पन्हाळा तालुक्यासाठी जलजीवन मिशनच्या प्रकल्प अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांची नियुक्ती केली असून हातकणंगलेसाठी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, शाहूवाडीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, राधानगरीतील आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गडहिंग्लज तालुक्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, शिरोळसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, करवीरमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, कागलसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, आजरा तालुक्यात महिला बालकल्याणच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, गगनबावडामध्ये दीपक घाटे, भुदरगडमध्ये जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार तर चंदगडसाठी कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांची नियुक्ती केली आहे. या संपर्क अधिकाऱयांनी 13 ते 15 जुलैपर्यंत नियुक्त केलेल्या तालुक्यामध्ये भेटी देऊन महापूराच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना राबवून नियोजन करावे लागणार आहे.
हे ही वाचा : Pune : खडकवासला धरण 100 टक्के भरले