प्रतिनिधी
भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते पण आता बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमच्या सोबत येईल असे वाटत नाही आणि आलेच तर कार्यकर्त्यांना ते मान्य होणार नाही अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर होत असलेल्या कारवाईबाबत खंत व्यक्त केली. राज्यात आणि जिल्ह्यात महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र असले तरी स्थानिक व सहकारमधील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कोल्हापुरात सध्या श्री. दुधगंगा वेधगांगा सहकरी साखर कारखाना म्हणजे बिद्री कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आरोप-प्रत्यारोपाने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काल पार पडलेल्या मतदार कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि शिंदे गटाचे आमदार आबिटकर यांच्यावर निशाणा साधत भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते आता बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमच्या सोबत येईल असे वाटत नाही आणि आलेच तर कार्यकर्त्यांना ते मान्य होणार नाही अशा शब्दात हसन मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या ईडी करवाई बद्दल खंत व्यक्त केली आहे.
सध्या कोल्हापुरत बिद्री कारखानाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून काल बिद्री कारखान्याच्या कागल तालुक्यातील मतदार सभासद करकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. महविकास आघाडी असताना मुश्रीफ यांच्यवर भाजपकडून ईडीने केलेली चौकशी आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकरांनी हसन मुश्रीफ यांच्या चौकशीची केलेली मागणी यावर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आताच्या या निवडणूकीत आमच्या बरोबर कोण येणार ? हा प्रश्न आहे कारण भाजप आमच्या सोबत येईल असे वाटत नाही. कारण तेच मला तुरुंगात घालायला निघाले होते…आणि जरी ते आले तरी कार्यकर्ते मान्य करणार नाहीत.” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकरांनी बिद्री कारखान्याच्या लेखापरीक्षणाची मागणी केली होती. यावर मुश्रीफ यांनी आबिटकर यांचे कान टोचले. “बिद्री कारखान्याचे कामकाज सुरळीत चालू असताना काही जणांनी लेखापरीक्षणाची मागणी करून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आई अंबाबाई बघून घेईल.शिवाय गेल्या दहा वर्षांपासून या कारखान्यात आपली सत्ता आहे ज्यामुळे आता देखील आपली सत्ता येईल.” असा पालकमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.