कळंबा : प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या बापुराम नगर मधील सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी गणेश मुर्तीला महा अभिषेक घालून, विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारास श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या गणेश जयंतीच औचित्य साधून, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते बापुराम नगर मित्र मंडळ व स्वर्गीय बाळासाहेब साळोखे सोशल फाऊंडेशन फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी श्यामराव चव्हाण, अरुण पाटील, अमित साळोखे, अमोल साळोखे, अरुण टोपकर, विजय पाटील कळंबा गावच्या नूतन लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव, उपसरपंच उदय जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्य करणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. कळंबा येथील उपनागरांचा विकास कमी पडू देणार नाही नवीन लवकरच उपनागरांचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. या बापुराम नगर येथे सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कळंबा इथल्या नूतन सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती तसच संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रध्यापक जयंत पाटील ,नुतून सदस्य विकास पोवार,पूनम जाधव,संदीप पाटील,स्वरूप पाटील,गवाणकर,एस वाय पाटील,चारपले बापुरम नगर मधिल सर्व भक्तांनी महिला मित्र मंडळी उपस्तीत होत्या.