शाहुवाडी, प्रतिनिधी
kolhapur Heavy Rain : शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार सुरू असलेल्या पावसाने कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर घोळसवडे पुलावर पाणी आले होते .मात्र काही वेळाने पावसाचा जोर कमी झाल्याने पुलावर आलेल्या पाण्याचाही जोर कमी होऊ लागला आहे.
शाहुवाडी तालुक्यात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. शुक्रवारी दिवसभर पश्चिम परिसरात पावसाचा जोर कायम होता. मध्यरात्री देखील पाऊस चांगला झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील घोळसवडे येथील पुलावर पाणी आली होते. पहाटेच्या वेळी पाणी अधिक होते मात्र काही वेळाने पाणी ओसरू लागले आहे.