रिक्त जागा भरण्याकडे दुर्लक्ष : उत्पादनावर परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
मधाचा नवीन ब्रँड बाजारात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, दुसरीकडे मधाचे उत्पादन करण्यासाठी तज्ञ आणि अधिकाऱयांची कमतरता भासत आहे. त्यामुळे मध उत्पादनावर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, कृषी आणि बागायत खात्याच्या इतर अधिकाऱयांना यासाठी जुंपले जात आहे. अधिकारी मधाच्या उत्पादनाविषयी अनभिज्ञ असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.
बेळगाव जिल्हय़ात जांबोटी भागात अधिक प्रमाणात मधाचे उत्पादन होते. शिवाय बागायत खात्याचे मध केंद्रदेखील त्या ठिकाणी आहे. या केंद्रातून उत्पादन केले जाते. तज्ञ लोकांच्याअभावी उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, कृत्रिम मध उत्पादन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. मात्र, मार्गदर्शन करणाऱया तज्ञ अधिकाऱयांचा अभाव दिसून येत आहे.
जांबोटी भागातील कापोली, चापोली, आमगाव, कणकुंबी, बेटणे, निलावडे आदी भागात मध उत्पादन होते. दरम्यान, फूल शेती आणि फळ शेतीत हे उत्पादन होते. अनेकांनी मधमाशांच्या पेटय़ा बसवून मध उत्पादनाला सुरुवात केली आहे. मात्र, तज्ञ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाअभावी उत्पादनावर परिणाम होत आहे. जांबोटी भागाला वनक्षेत्र लागून असल्याने मकरंद आणि परागकण मिळणाऱया जांभूळ, आंबा, काजू, पेरू, सूर्यफूल आदी फळांच्या झाडांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नैसर्गिक मधाची पोळीदेखील अधिक आहेत. त्यामुळे या भागात मधाचे उत्पादन अधिक होते. मात्र, मध उत्पादनासाठी लागणाऱया तज्ञ अधिकाऱयांची कमतरता जाणवत आहे.
मध उत्पादकांना मार्गदर्शन
जांबोटी भागात मधाचे उत्पादन घेण्यासाठी केंद्र आहे. या ठिकाणी प्रशिक्षण देऊन मधमाशी पालनासाठी पेटय़ा (प्रेम) दिल्या जातात. तज्ञांची कमतरता असली तरी मध उत्पादकांना मार्गदर्शन केले जाते.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)