म्हापसा, लोकमान्य कॉर्पोरेट बेळगाव, बेळगाव रिजनल, मडगाव रिजनल, तरुण भारत बेळगाव, मुंबई रिजनल संघ विजयी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी म्हापसा प्रादेशिक संघ, लोकमान्य कॉर्पोरेट, बेळगाव रिझनल, मडगाव रिजनल, तरुण भारत बेळगाव, मुंबई रिजनल संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. योगेश म्हापसा, अमर खणगावकर, अजय भोसले, रवी भांदुर्गे, उमेश, मयुर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आरपीडी मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य समितीचे संचालक अजित गरगट्टी, पंढरी परब, सुबोध गावडे, गजानन धामणेकर, सीईओ अभिजित दीक्षित, विनायक जाधव व सर्व शाखेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते चषकांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर सुबोध गावडे यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात म्हापसा प्रादेशिक संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. तरुण भारत गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 40 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना म्हापसा संघाने 3 षटकात 1 गडी बाद 41 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. या सामन्यात 4 गडी बाद करणाऱ्या योगेशला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात लोकमान्य कॉर्पोरेट संघाने फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 110 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रत्नागिरी संघाने 8 षटकात सर्व गडी बाद 66 धावाच केल्या. हा सामना लोकमान्य संघाने 44 धावांनी जिंकला. अमर खाणगावकर याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर रिजनल संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 69 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव संघाने 5 षटकात बिनबाद 70 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. नाबादा 50 धावा करणाऱ्या अजय भोसलेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. चौथ्या सामन्यात
मॅनेजमेंट संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 77 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मडगाव रिजनल संघाने 8 षटकात 7 गडी बाद 54 धावाच केल्या. हॅटट्रीक साधणाऱ्या रवी भांदुर्गेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पाचव्या सामन्यात मुंबई रिजनल संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 90 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तरुण भारत गोवा संघाने 8 षटकात 9 गडी बाद 50 धावाच केल्या. हा सामना मुंबई सांघने 40 धावांनी जिंकला. 36 धावा करणाऱ्या उमेशला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सहाव्या सामन्यता रत्नागिरी रिझनल संघाने 8 षटकात 6 गडी बाद 51 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तरुण भारत बेळगाव संघाने 6 षटकात 2 गडी बाद 52 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. 14 धावात 7 गडी बाद करणाऱ्या मयुरला सामनावीर पुरस्कार मिळाला.